शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

अधिग्रहणातील विहिरींना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:34 AM

चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली : खासगी ३७३ विहिरी अन् ६५ टँकरवर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात ३७३ खासगी विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तात्पुरता उपाय म्हणून अमरावती तालुक्यात बोडणा, परसोडा डिगरगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, मोझरी, भारवाडी, सार्सी, गुरुदेवनगर, घोटा, माळेगाव, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव आखतवाडा, पोरगव्हाण, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खुर्द, आमला, जळका, निमला, सावंगी, अमदोरी, धामणगाव तालुक्यात उसळगव्हाण, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, शिंदी, घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात सोमवारखेडा, भिलखेडा, मनभंग, आडनदी, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, भांदरी, खडीमल, कुलंगना, गौरखेडा, मोथा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोंगडा, आकी, नागापूर, एकझिरा व चौराकुंड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.उपाययोजनांची सद्यस्थितीआराखड्यानुसार १९३९ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यापैकी ८३३ गावांच्या ९५५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६८ गावांच्या ५४० उपाययोजनांची कामे सुरू आहेत, तर ३२१ गावांच्या ४०६ उपायोजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ८ कोटी ३ लाख ६७ हजारांचा निधी अपेक्षित आहे.१.१८ लाख नागरिकांचीमदार टँकरवरपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात १० तालुक्यांतील ६४ गावे व १,१८,२०२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. अमरावती तालुक्यातील तीन गावांत २४८९, तिवसा तालुक्यातील १० गावांत २७४९८,मोर्शी तालुक्यातील ११ गावांत १८१८९, वरूड तालुक्यातील एका गावात ३१९६, चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावांत १२४४५, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन गावांत २९६०, अचलपूर तालुक्यातील दोन गावांत २१५४७, चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ७५१२, चिखलदरा तालुक्यातील २६ गावांत १४८९९, धारणी तालुक्यातील एका गावांत १०५० लोकसंख्येची मदार टँकरवर आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई