शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

पाणीटंचाईच्या कामात कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या कामाचा आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्षांची सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्याच्या कामात पाणीपुरवठा विभागाकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, अशी ताकीद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ६ मे रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेत अधिकाऱ्यांना दिली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या कामाचा आढावा सभेत घेण्यात आला. सभेला जलव्यवस्थापन समितीचे सभापती तथा अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, जलसंधारण अधिकारी प्रमोद तलवारे, मजिप्राचे कार्यकारी अभियंता सुरेश कोपुलवार आदी उपस्थित होते. सध्या ग्रामीण भागात १० ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये नऊ टॅकर चिखलदरा तालुक्यात, तर १ टँकर अचलपूर तालुक्यातील पथ्रोट या गावात सुरू आहे. याशिवाय दर्यापूर तालुक्यातही पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने अध्यक्षांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय मागील पाच वर्षांपासून सतत मेळघाटातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना पाणी पुरवठ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीने पारित केला आहे. यासोबतच चंद्रभागा व शहानूर प्रकल्पातून मेळघाटातील धरणालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव सभापती दयाराम काळे यांनी मांडला. हा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जलसंधारण विभागाकडून सध्या किती तलावांमध्ये पाणीसाठा आहे, कुठे पाणी अडविण्यासाठी पाट्या टाकण्यात आल्या व आताची परिस्थिती यावर झालेला खर्च याची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. पाणीटंचाईची समस्या ज्याही गावात निर्माण होईल, तेथे तातडीने उपाययोजना कराव्यात. यात वेळकाढू धोरण कदापिही सहन केले जाणार नाही, असा दम अध्यक्षांनी सभेत भरला. याप्रसंगी इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईzpजिल्हा परिषद