शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

पाणीटंचाईच्या कामात कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या कामाचा आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्षांची सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्याच्या कामात पाणीपुरवठा विभागाकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, अशी ताकीद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ६ मे रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेत अधिकाऱ्यांना दिली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या कामाचा आढावा सभेत घेण्यात आला. सभेला जलव्यवस्थापन समितीचे सभापती तथा अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, जलसंधारण अधिकारी प्रमोद तलवारे, मजिप्राचे कार्यकारी अभियंता सुरेश कोपुलवार आदी उपस्थित होते. सध्या ग्रामीण भागात १० ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये नऊ टॅकर चिखलदरा तालुक्यात, तर १ टँकर अचलपूर तालुक्यातील पथ्रोट या गावात सुरू आहे. याशिवाय दर्यापूर तालुक्यातही पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने अध्यक्षांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय मागील पाच वर्षांपासून सतत मेळघाटातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना पाणी पुरवठ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीने पारित केला आहे. यासोबतच चंद्रभागा व शहानूर प्रकल्पातून मेळघाटातील धरणालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव सभापती दयाराम काळे यांनी मांडला. हा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जलसंधारण विभागाकडून सध्या किती तलावांमध्ये पाणीसाठा आहे, कुठे पाणी अडविण्यासाठी पाट्या टाकण्यात आल्या व आताची परिस्थिती यावर झालेला खर्च याची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. पाणीटंचाईची समस्या ज्याही गावात निर्माण होईल, तेथे तातडीने उपाययोजना कराव्यात. यात वेळकाढू धोरण कदापिही सहन केले जाणार नाही, असा दम अध्यक्षांनी सभेत भरला. याप्रसंगी इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईzpजिल्हा परिषद