शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजात हलगर्जीपणा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

खासदार नवनीत राणा, रामदास तडस, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार रवि राणा, सुलभा खोडके, देवेंद्र भुयार, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देडीपीसी बैठक । पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील विकासकामे गतिमान करण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामांच्या फायली वेळीच निकाली काढाव्यात. अधिकाºयांनी यात कामचुकारपणा करू नये, अन्यथा दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. त्या शनिवारी जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला संबोधित करीत होत्या.खासदार नवनीत राणा, रामदास तडस, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार रवि राणा, सुलभा खोडके, देवेंद्र भुयार, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाल्या, ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांसह विविध नावीन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात येईल. अधिकाधिक विकासकामे व्हावीत, यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२०-२१ साठी २१९ कोटी १८ लाख रुपये नियोजित खर्च असून, अधिक विकासकामे व अपेक्षित अतिरिक्त निधी मागणीबाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली.प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे व्हावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजनात करण्यात येणार आहे. ७० गावे पाणीपुरवठा योजनेचा सौरऊर्जा प्रकल्पाशी सांगड घालण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. तूर खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत. शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची गतीने अंमलबजावणी करावी. अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानाचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाठपुरावा करण्यात यावा. तिवसा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे काम तात्काळ सुरू करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकर मार्गी लागण्यासाठी कॅबिनेटमध्ये पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. प्राप्त निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. फास्ट फॉरवर्ड होत कामे करावीत. ग्रामपंचायत व इतर महत्त्वाच्या कार्यालयांच्या शिकस्त इमारती असतील, तिथे नवीन इमारती व गावोगाव अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. सभेला उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध मुद्द्यांकडे पालकमंत्र्याचे लक्ष वेधले. सभेला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.शिक्षण, क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करणारजिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासकामांसोबतच शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांतही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. शाळा, अंगणवाडी केंद्राच्या खोल्या व इमारती बांधकाम करण्यास पुरेसा निधी दिली जाणार आहे. याशिवाय गर्ल्स हायस्कूल येथे इंग्रजी व सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यास प्रयत्न केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. क्रीडा व शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये खेळाडंूना शासनाकडून मदत मिळत नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या. मेळघाटच्या विकासाकरिता विशेष नियोजन करून कामे केली जातील. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व अन्य पायाभूत सुविधांकरिता भरीव निधी देऊन सर्वसमावेश विकास करण्यास प्रयत्न केले जातील. याशिवाय शेतकरी कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा, याकरिता अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते.समन्वय समितीची दरमहा सभाप्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी १०.३० वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकासकामांविषयी बैठक घेण्याची घोषणा पाकलमंत्री यशोमती ठाकूर यांनी डीपीसी बैठकीत केली. विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही गती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्याचे खासदार आणि आमदारांची समन्वय सभा घेतली जाणार आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरnavneet kaur ranaनवनीत कौर राणा