अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी जिल्हा काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:32+5:302021-02-05T05:25:32+5:30
धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ ...

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी जिल्हा काँग्रेस आक्रमक
धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी येथील इर्विन चौकात धरणे आंदोलनात जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसने केली आहे. याबाबतचे निवदेन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.
अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हाॅटसॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेेच्या ३ दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? देशाची संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून अर्णब गोस्वामींंवर कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदींनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, संजय काळमेघ, श्रीकांत काळमेघ, नीलेश घोडेराव, प्रदीप देशमुख, छाया दंडाळे, वासंती मंगरोळे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, संजय वानखडे, भागवत खांडे, हरिभाऊ मोहोड, विनोद गुळदे, दिलीप काळबांडे, प्रकाश काळबांडे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, संजय लायदे, राहुल येवले, मिश्रिला झारखंडे, परीक्षित जगताप, पंकज मोरे, मुकुंद देशमुख, बिटू मंगरोळे, बच्चू बोबडे, श्रीकांत झोडपे, सुनील गावंडे, मुकदर खाँ पठाण, जयंत देशमुख, श्रीधर काळे, भैयासाहेब मेटकर, अमोल बोरेकर, वनिता पाल, अरविंद लिंगोट, प्रशांत गोरले, विठ्ठल सरडे, बाबाराव बहुरूपी, अनंत साबळे, अभिजित देवके, किशोर देशमुख, बाबुराव जवंजाळ, संजय देशमुख, संजय बेलोकार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बॉक्स
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : पालकमंत्री
देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, या सर्व प्रकाराची चौकशी करावी व अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
बॉक्स
कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे कृत्य हे ऑफिशियल सीक्रेट ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. हा देशद्रोहाचा सुध्दा प्रकार आहे. त्यामुळे अर्णब यांना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हा कॉंग्रेस या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.