शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणावरून वाढले मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली.

ठळक मुद्देसमर्थक विरोधक समोरासमोर । प्रशासनाकडून आदेशानुसार कार्यवाहीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार स्थलांरणाची प्रक्रिया सुरू झाली. तहसील कार्यालयातील शासकीय दस्तावेज स्थलांतरणात खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावरून शनिवारी तहसील स्थलांतरण समर्थक व विरोधक आमसे सामने आले होते. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार टळला.भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. दरम्यान शासकीय दस्तऐवज काही राजकीय पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहनात भरण्याचे काम केल्याची बाब अयोग्य ठरवून शासकीय दस्तऐवजांतील एखादे दस्तावेज गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न झेडपीचे बांधकाम सभापती जयंत देशमुख व भातकुली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, सुनील जुनघरे, सोपान गुडधे, अमरदीप तेलखडे, मंगेश वाहने, उमेश महिंगे, अजय देशमुख, मनोहर अग्रवाल, कैलास अवघड, अनिल बिरे, रोहित देशमुख, नीलेश सरवे जियाउद्दीन, वहीद, राजेश महल्ले यांनी तहसीलदारांना केला. त्यामुळे शासकीय साहित्य स्थलांतरण प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणाचाही सहभाग नसावा, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. श्रीकांत राठी, ब्रदीनाथ थोपसे, गणेश बांबल, विकास देशमुख, संजय चुनकीकर, जयकुमार रघुवंशी, बांबल गुरूजी, विजय पाचपोर, डॉ.पवार, सचिन सरोदे, गोपाल सोळंके, योगेश भट्टड, योगेश उमक, विशाल भट्टड, प्रमोद भोपसे आदींनी केली.अमरावतीत भातकुलीचे तहसील कार्यालय हे तालुक्यातील अनेक गावांच्या सोईचे आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला. जनभावनेचा आदर करून तहसील कार्यालय येथे असणे गरजेचे आहे.- जयंत देशमुख,सभापती, बांधकाम जिल्हा परिषदशासनाच्या अधिसूचनेनुसार तहसील कार्यालय स्थालांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने त्यांचे काम करावे. इतरांनी यात दबाब न आणता तहसीलचे काम भातकुली येथे सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.- श्रीकांत राठी,नागरिक

टॅग्स :Tahasildarतहसीलदार