शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणावरून वाढले मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली.

ठळक मुद्देसमर्थक विरोधक समोरासमोर । प्रशासनाकडून आदेशानुसार कार्यवाहीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार स्थलांरणाची प्रक्रिया सुरू झाली. तहसील कार्यालयातील शासकीय दस्तावेज स्थलांतरणात खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावरून शनिवारी तहसील स्थलांतरण समर्थक व विरोधक आमसे सामने आले होते. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार टळला.भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. दरम्यान शासकीय दस्तऐवज काही राजकीय पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहनात भरण्याचे काम केल्याची बाब अयोग्य ठरवून शासकीय दस्तऐवजांतील एखादे दस्तावेज गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न झेडपीचे बांधकाम सभापती जयंत देशमुख व भातकुली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, सुनील जुनघरे, सोपान गुडधे, अमरदीप तेलखडे, मंगेश वाहने, उमेश महिंगे, अजय देशमुख, मनोहर अग्रवाल, कैलास अवघड, अनिल बिरे, रोहित देशमुख, नीलेश सरवे जियाउद्दीन, वहीद, राजेश महल्ले यांनी तहसीलदारांना केला. त्यामुळे शासकीय साहित्य स्थलांतरण प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणाचाही सहभाग नसावा, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. श्रीकांत राठी, ब्रदीनाथ थोपसे, गणेश बांबल, विकास देशमुख, संजय चुनकीकर, जयकुमार रघुवंशी, बांबल गुरूजी, विजय पाचपोर, डॉ.पवार, सचिन सरोदे, गोपाल सोळंके, योगेश भट्टड, योगेश उमक, विशाल भट्टड, प्रमोद भोपसे आदींनी केली.अमरावतीत भातकुलीचे तहसील कार्यालय हे तालुक्यातील अनेक गावांच्या सोईचे आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला. जनभावनेचा आदर करून तहसील कार्यालय येथे असणे गरजेचे आहे.- जयंत देशमुख,सभापती, बांधकाम जिल्हा परिषदशासनाच्या अधिसूचनेनुसार तहसील कार्यालय स्थालांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने त्यांचे काम करावे. इतरांनी यात दबाब न आणता तहसीलचे काम भातकुली येथे सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.- श्रीकांत राठी,नागरिक

टॅग्स :Tahasildarतहसीलदार