शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणावरून वाढले मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली.

ठळक मुद्देसमर्थक विरोधक समोरासमोर । प्रशासनाकडून आदेशानुसार कार्यवाहीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार स्थलांरणाची प्रक्रिया सुरू झाली. तहसील कार्यालयातील शासकीय दस्तावेज स्थलांतरणात खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावरून शनिवारी तहसील स्थलांतरण समर्थक व विरोधक आमसे सामने आले होते. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार टळला.भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. दरम्यान शासकीय दस्तऐवज काही राजकीय पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहनात भरण्याचे काम केल्याची बाब अयोग्य ठरवून शासकीय दस्तऐवजांतील एखादे दस्तावेज गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न झेडपीचे बांधकाम सभापती जयंत देशमुख व भातकुली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, सुनील जुनघरे, सोपान गुडधे, अमरदीप तेलखडे, मंगेश वाहने, उमेश महिंगे, अजय देशमुख, मनोहर अग्रवाल, कैलास अवघड, अनिल बिरे, रोहित देशमुख, नीलेश सरवे जियाउद्दीन, वहीद, राजेश महल्ले यांनी तहसीलदारांना केला. त्यामुळे शासकीय साहित्य स्थलांतरण प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणाचाही सहभाग नसावा, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. श्रीकांत राठी, ब्रदीनाथ थोपसे, गणेश बांबल, विकास देशमुख, संजय चुनकीकर, जयकुमार रघुवंशी, बांबल गुरूजी, विजय पाचपोर, डॉ.पवार, सचिन सरोदे, गोपाल सोळंके, योगेश भट्टड, योगेश उमक, विशाल भट्टड, प्रमोद भोपसे आदींनी केली.अमरावतीत भातकुलीचे तहसील कार्यालय हे तालुक्यातील अनेक गावांच्या सोईचे आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला. जनभावनेचा आदर करून तहसील कार्यालय येथे असणे गरजेचे आहे.- जयंत देशमुख,सभापती, बांधकाम जिल्हा परिषदशासनाच्या अधिसूचनेनुसार तहसील कार्यालय स्थालांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने त्यांचे काम करावे. इतरांनी यात दबाब न आणता तहसीलचे काम भातकुली येथे सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.- श्रीकांत राठी,नागरिक

टॅग्स :Tahasildarतहसीलदार