शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना थेट भेट, प्रक्रियेला अधिकाऱ्यांचा ‘खो’

By admin | Updated: December 8, 2014 22:28 IST

राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात

अमरावती : राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात मुक्कामाला जाण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, सहारिया मुख्य सचिव पदावरुन सेवानिवृत्त होऊन राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले. अशातच आघाडी सरकारचा कार्यकाळ संपला. राज्यात नवे भाजपा सरकार सत्तेत येताच ग्रामस्थांना थेट भेटण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जे.एम. सहारिया यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या जणून घ्यावा यासाठी हा उपक्रम सुरु केला. दरम्यान वीज, पोलीस आरोग्य या विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गावात राहून आपल्या विभागाशी संबंधित समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. राज्यभर सुरु झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत बहुतांश जिल्हाधिकारी गावात राहून आलेत. तेथील प्रश्न जाणून ते मार्गी लावण्यातही यश मिळविले. अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्च महिन्यापर्यंत गावागावांत मुक्काम करुन आले. मात्र अशातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्यामुळे पुन्हा दुसरी दोन नवी गावे निवडतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तसेच कामाच्या व्यापात काही घडलेच नाही. परिणामी हा लोकाभिमुख उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे.
यापूर्वी मुख्य सचिवांच्या आदेशामुळे वरिष्ठ अधिकारी गावात येत असल्याने गावातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत होती. दरम्यान बहुतांश गावांत महसूल विभाग, आरोग्य, पोलीस पाटबंधारे यांचेही प्रश्न आहेत. सध्या वीज भारनियमन सुरु आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक बसतो आहे. विजेअभावी ग्रामस्थांना कशा कठीण परिस्थितीतून जावे लागते हे सांगुूा कळणार नाही. त्यापेक्षा त्याचा अनुभव घेतल्यावरच गांभीर्य लक्षात येते. याशिवाय दुर्गम भागासोबतच रस्त्यावरील गावांतील काही गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमुळे नागरिकांत निर्माण होणारे भय काय असते हेही कळून येते. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही एक दिवस गावात थांबून हा प्रकार अनुभवला, याचा गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न आहेत. बहुतांश ठिकाणी दवाखाने असले तरी तेथे डॉक्टर थांबत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांचे कसे हाल होतात याचा अनुभव घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यावर उपाय करता येईल. दर महिन्याला दोन गावांचे प्रश्न सुटले तरी मोठी मदत होईल. मात्र तत्कालीन मुख्य सचिव सहारिया यांनी सुरु केलेला हा उपक्रम सचिव व सरकार बदलताच बंद पडला की काय यावरुन सध्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.