शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

ग्रामस्थांना थेट भेट, प्रक्रियेला अधिकाऱ्यांचा ‘खो’

By admin | Updated: December 8, 2014 22:28 IST

राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात

अमरावती : राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात मुक्कामाला जाण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, सहारिया मुख्य सचिव पदावरुन सेवानिवृत्त होऊन राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले. अशातच आघाडी सरकारचा कार्यकाळ संपला. राज्यात नवे भाजपा सरकार सत्तेत येताच ग्रामस्थांना थेट भेटण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जे.एम. सहारिया यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या जणून घ्यावा यासाठी हा उपक्रम सुरु केला. दरम्यान वीज, पोलीस आरोग्य या विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गावात राहून आपल्या विभागाशी संबंधित समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. राज्यभर सुरु झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत बहुतांश जिल्हाधिकारी गावात राहून आलेत. तेथील प्रश्न जाणून ते मार्गी लावण्यातही यश मिळविले. अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्च महिन्यापर्यंत गावागावांत मुक्काम करुन आले. मात्र अशातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्यामुळे पुन्हा दुसरी दोन नवी गावे निवडतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तसेच कामाच्या व्यापात काही घडलेच नाही. परिणामी हा लोकाभिमुख उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे.यापूर्वी मुख्य सचिवांच्या आदेशामुळे वरिष्ठ अधिकारी गावात येत असल्याने गावातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत होती. दरम्यान बहुतांश गावांत महसूल विभाग, आरोग्य, पोलीस पाटबंधारे यांचेही प्रश्न आहेत. सध्या वीज भारनियमन सुरु आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक बसतो आहे. विजेअभावी ग्रामस्थांना कशा कठीण परिस्थितीतून जावे लागते हे सांगुूा कळणार नाही. त्यापेक्षा त्याचा अनुभव घेतल्यावरच गांभीर्य लक्षात येते. याशिवाय दुर्गम भागासोबतच रस्त्यावरील गावांतील काही गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमुळे नागरिकांत निर्माण होणारे भय काय असते हेही कळून येते. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही एक दिवस गावात थांबून हा प्रकार अनुभवला, याचा गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न आहेत. बहुतांश ठिकाणी दवाखाने असले तरी तेथे डॉक्टर थांबत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांचे कसे हाल होतात याचा अनुभव घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यावर उपाय करता येईल. दर महिन्याला दोन गावांचे प्रश्न सुटले तरी मोठी मदत होईल. मात्र तत्कालीन मुख्य सचिव सहारिया यांनी सुरु केलेला हा उपक्रम सचिव व सरकार बदलताच बंद पडला की काय यावरुन सध्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.