शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पाणीटंचाई ग्रस्त गावाना स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला वस्तुनिष्ठ अहवाल

By जितेंद्र दखने | Updated: May 7, 2024 21:41 IST

टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.

अमरावती : सध्या एकीकडे कडक उन्हाळा तापत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्याही दिवसेदिवस वाढत आहेत. त्यामुळे टॅकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावात महसुलसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्या बैठकीत शुक्रवारी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.सध्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या चांगलीच पेटली आहे. परिणामी जिल्हाभरातील अनेक गावात  खासगी विविर अधिग्रहण व ८ गावात ११ टॅकरने नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली.या बैठकीत टॅकरने पाणी पुरवठा केलेल्या गावांचा माहिती जाणून घेतली  असता या ठिकाणी चांदुर रेल्वे तालुक्यात एक़ आणि  मेळघाटातील ७ आदिवासी बहूल गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली.  दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी कटियार यांनी टॅकरने पाणी पुरवठा केल्या जात असलेल्या गावांना संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  यांनी  संबंधित गावांना प्रत्यक्ष भेटी देवून अहवाल सादर करावा,जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  यांनीही सदर गावाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेवून गावातील  लोकांना पिण्याच्या पाण्याचा टॅकरने योग्यरित्या पाणी पुरवठा होतो किंवा नाही याबाबत माहिती घेवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याशिवाय टॅकरग्रस्त गावासाठी सुरू असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व स्वतंत्र पाणी पुरवठा योजना संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करून गावे टॅकरमुक्त होतील व भविष्यात टॅकरने पाणी पुरवठा करण्याची गरज पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनतेच्या तक्रारीची गांर्भियाने दखल घ्यापाणी टंचाई हा अत्यंत महत्वाचा विषय असून सर्व संबंधित अधिकारी  यांनी पाणी टंचाई संदर्भात नागरिकांकडून प्राप्त तक्रारीची गांर्भियाने दखल घेवून व भविष्यात ज्या गावामध्ये पाणी टंचाई सदुष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या गानांना तातडीने भेटी देवून तेथील पाणीटंचाई बाबत परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठाग्रामीण भागात सध्या उन्हाळयाचे दिवसामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे.आजघडीला चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला,मोथा, खडीमल,धरमडोह, आकी,बहादरपूर व गौलखेडा बाजार आदी गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात