शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार रुपये प्रतिपूर्ती शुल्क, चौथ्या सोडतीची पालक वर्गातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 7:01 PM

आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश देणा-या शाळांना गतवर्षीप्रमाणे ५० टक्के प्रतिपूर्ती शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाही विभागातील ९५५ शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार ६१७ रुपये मिळणार आहेत.गरिबांच्या मुलांनाही दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून राज्यात ‘बालकांच्या हक्काचे व मोफत शिक्षण कायदा २००९’ अंतर्गत राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. मागील सहा वर्षांपासून अमरावती विभागात ९०० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे, तर दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. शिक्षण विभागाने २०१८-१९ चे प्रतिपूर्ती शुल्क प्रतिविद्यार्थी १७ हजार ६५७  रुपये करून ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळावा, यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ९५५ शाळांची नोंदणी करण्यात आली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल २६ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले होते. एकूण जागा १० हजार ५२२ असताना दुप्पटीहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा वाढली होती. अंतिम फेरीअखेर ८ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर अद्याप २०२८ जागा रिक्त आहेत. विविध कारणांनी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या जागांवर आॅफलाइन पद्धतीने करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शासनाने यावर्षी केवळ तीन फेºयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात आली.

टॅग्स :Schoolशाळा