शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:28 IST

मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’ची नोंदयवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांची स्थिती बिकट

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा नोंदविण्यात आले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा अमरावती विभागातील ६७१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीचे निरीक्षण मार्च अखेर नोंदविण्यात आले व पाच वर्षांतील मार्च महिन्याच्या पाणी पातळीची तुलनात्मक स्थिती नोंदविण्यात आली. विभागातील भूजलाची धक्कादायक नोंद समोर आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वच म्हणजेच १४ तालुक्यांतील भूजलात घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच सात तालुक्यांत, वाशिम जिल्ह्यात सहा, बुलडाणा जिल्ह्यात १३ तर यवतमाळ जिल्ह्यात १६ पैकी ९ तालुक्यांतील भूजलात घट होत असल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यात ४ ते ६ मीटरपर्यंत, अमरावती जिल्ह्यातील २ व अकोला जिल्ह्यात १ तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत तूट आलेली आहे.विभागातील २९ तालुक्यांत १ ते २ मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये अमरावती ८, अकोला २, वाशिम ४, बुलडाणा ५ व यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुके आहेत. तसेच २१ तालुक्यांत एक मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये ेअमरावती जिल्ह्यात २, अकोला जिल्ह्यात २, वाशिम जिल्ह्यात २, बुलडाणा ८, व यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. भूजलस्तर झपाट्याने कमी होत असल्याने या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे.अमरावती विभागातील ५०२ जलाशयांत १६ टक्के साठाअमरावती विभागात मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ५३१.८२ दलघमी म्हणजेच १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये ९ मुख्य प्रकल्पांत २७६ दलघमी म्हणजेच १८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पात १४२ दलघमी म्हणजेच २१ टक्के, तर ४६९ लघु प्रकल्पांत ११३ दलघमी म्हणजेच १० टक्के साठा शिल्लक आहे. सध्या असणारे ४५ ते ४६ अंश तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. या प्रकल्पांमध्ये ५ ते ८ टक्क््यांपर्यंत मृतसाठा असल्याने अर्धेअधिक प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई