शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:28 IST

मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’ची नोंदयवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांची स्थिती बिकट

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा नोंदविण्यात आले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा अमरावती विभागातील ६७१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीचे निरीक्षण मार्च अखेर नोंदविण्यात आले व पाच वर्षांतील मार्च महिन्याच्या पाणी पातळीची तुलनात्मक स्थिती नोंदविण्यात आली. विभागातील भूजलाची धक्कादायक नोंद समोर आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वच म्हणजेच १४ तालुक्यांतील भूजलात घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच सात तालुक्यांत, वाशिम जिल्ह्यात सहा, बुलडाणा जिल्ह्यात १३ तर यवतमाळ जिल्ह्यात १६ पैकी ९ तालुक्यांतील भूजलात घट होत असल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यात ४ ते ६ मीटरपर्यंत, अमरावती जिल्ह्यातील २ व अकोला जिल्ह्यात १ तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत तूट आलेली आहे.विभागातील २९ तालुक्यांत १ ते २ मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये अमरावती ८, अकोला २, वाशिम ४, बुलडाणा ५ व यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुके आहेत. तसेच २१ तालुक्यांत एक मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये ेअमरावती जिल्ह्यात २, अकोला जिल्ह्यात २, वाशिम जिल्ह्यात २, बुलडाणा ८, व यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. भूजलस्तर झपाट्याने कमी होत असल्याने या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे.अमरावती विभागातील ५०२ जलाशयांत १६ टक्के साठाअमरावती विभागात मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ५३१.८२ दलघमी म्हणजेच १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये ९ मुख्य प्रकल्पांत २७६ दलघमी म्हणजेच १८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पात १४२ दलघमी म्हणजेच २१ टक्के, तर ४६९ लघु प्रकल्पांत ११३ दलघमी म्हणजेच १० टक्के साठा शिल्लक आहे. सध्या असणारे ४५ ते ४६ अंश तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. या प्रकल्पांमध्ये ५ ते ८ टक्क््यांपर्यंत मृतसाठा असल्याने अर्धेअधिक प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई