शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:28 IST

मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’ची नोंदयवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांची स्थिती बिकट

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा नोंदविण्यात आले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा अमरावती विभागातील ६७१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीचे निरीक्षण मार्च अखेर नोंदविण्यात आले व पाच वर्षांतील मार्च महिन्याच्या पाणी पातळीची तुलनात्मक स्थिती नोंदविण्यात आली. विभागातील भूजलाची धक्कादायक नोंद समोर आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वच म्हणजेच १४ तालुक्यांतील भूजलात घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच सात तालुक्यांत, वाशिम जिल्ह्यात सहा, बुलडाणा जिल्ह्यात १३ तर यवतमाळ जिल्ह्यात १६ पैकी ९ तालुक्यांतील भूजलात घट होत असल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यात ४ ते ६ मीटरपर्यंत, अमरावती जिल्ह्यातील २ व अकोला जिल्ह्यात १ तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत तूट आलेली आहे.विभागातील २९ तालुक्यांत १ ते २ मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये अमरावती ८, अकोला २, वाशिम ४, बुलडाणा ५ व यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुके आहेत. तसेच २१ तालुक्यांत एक मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये ेअमरावती जिल्ह्यात २, अकोला जिल्ह्यात २, वाशिम जिल्ह्यात २, बुलडाणा ८, व यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. भूजलस्तर झपाट्याने कमी होत असल्याने या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे.अमरावती विभागातील ५०२ जलाशयांत १६ टक्के साठाअमरावती विभागात मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ५३१.८२ दलघमी म्हणजेच १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये ९ मुख्य प्रकल्पांत २७६ दलघमी म्हणजेच १८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पात १४२ दलघमी म्हणजेच २१ टक्के, तर ४६९ लघु प्रकल्पांत ११३ दलघमी म्हणजेच १० टक्के साठा शिल्लक आहे. सध्या असणारे ४५ ते ४६ अंश तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. या प्रकल्पांमध्ये ५ ते ८ टक्क््यांपर्यंत मृतसाठा असल्याने अर्धेअधिक प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई