शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:07 PM

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : यशोमती ठाकू र, वीरेंद्र जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीन झाडांनी माना टाकल्या आहेत. कमी पावसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. परंतु, मृग नक्षत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर तग धरून असलेले सोयाबीन आता पिवळे पडूृन सुकत चालले आहे. पिकांची स्थिती पाहून शेतकरी हवालदील होत आहेत. शेंगा भरल्या नसल्याने हे नगदी पीक शेतकºयांच्या हातून निसटले आहे. तिवसा तालुक्यातील २२ हजार १५३ हेक्टरवरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांनी केली. सोमवारी आठवड्याचा प्रारंभ असल्याने कुठल्याही बैठकीला झेडपी अधिकाºयांना बोलविण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आमदारद्वयांंनी केली. यावेळी झडेपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, रमेश काळे, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, नरेंद्र विघ्ने, वीरेंद्र जाधव, नौशाद पठाण, इम्रान खान, दिलीप काळबांडे, अभिजित मानकर, विष्णू राठोड, पिंटू गुडधे, ऐनुल्ला खान, पंकज देशमुख, नंदू खडसे, मुकद्दरखाँ पठाण, साहेबराव ठाकरे आदी उपस्थित होते.मृग, उडिदाची खरेदी सुरू करामूग व उडीद बाजार समितीत दाखल होण्यास दोन आठवडे झाले. दोन्ही शेतमालाची मोठी आवक आहे. मात्र, व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २५०० रुपये नुकसान होत आहे. पणनमंत्री मात्र हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आॅक्टोबरच्या मुहूर्तावर ठाम आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी आमदारद्वयांनी केली.सोयाबीन पडले पिवळेतिवसा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दमदार दिसणारे सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकºयांचे हातचे नगदी पीक गेले आहे. दोन वर्षांच्या दुष्काळाने होरपळल्यानंतर मागील वर्षी शेतमालाला मिळालेला मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी आमदारद्वयांंनी केली आहे.खोलापूरच्या मतदार यादीतून नावे गहाळभातकुली तालुक्यातील खोलापूर येथील जवळपास ७०० मतदारांची नावे यादीत नसल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्यावतीने केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज संस्थेची मतदार यादी व विधानसभा, लोकसभा निवडणुकीची मतदार यादी यात फरक आहे. सदर मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांकडून याची तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.जिल्हाभरात सोयाबीनचे पीक हातून गेले आहे. शेतकºयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करा. नुकसानभरपाई द्या. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. मूग व उडीदाची खरेदी केंद्र सुरू करा.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसाविविध शेतांमध्ये सोयाबीन पिकाची अचानक पाहणी केली. पाहणीत नुकसान स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठवून, सर्र्वेेक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारीसोयाबीनचे नुकसान प्रचंड आहे. मूग व उडिदाची शासकीय खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. ते त्वरित सुरू करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वे