शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मृत शेळी पशुधन उपायुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पशुवैद्यकाच्या गैरहजेरीमुळे पशुधन दगावल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने १६ हजार रुपये किमतीची शेळी दगावली. या प्रकाराने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने मृत शेळी अमरावती येथील पशुसंवर्धन सहउपायुक्त राजेंद्र पेठे यांच्या दालनात आणली.रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे. या ठिकाणी असलेल्या शेळ्यांपैकी एक, राजस्थान येथून आणलेली १६ हजार रुपये किमतीची शेळी आजारी पडली. तिच्यावर बेलोरा व चांदूर बाजार येथील पशुदवाखान्यात उपचारासाठी आणले. सदर शेळीची प्रकृती अधिकच खराब झाल्यामुळे पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने शेळी दगावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी अशाप्रकारे उपचाराअभावी गाय दगावली होती. पशुवैद्यकीय मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, याकरिता चार सदस्यीय समिती नेमावी, अशी मागणी रवि पाटील यांनी पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांच्याकडे केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली.मुख्यालयी राहण्याचे आदेशजिल्हाभरातील पशुदवाखान्यामध्ये नियुक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत कळविण्याचे आदेश पशुसंवर्धंन उपायुक्त यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय कुठल्याही पशुधनाची गैरसोय होऊ नये, याकरिताही सक्त ताकीद दिली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी दिली.पशुसंवर्धन विभागाचे सर्वच ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. उलट, घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे.- रवि पाटील, शेतकरी तथा पशुपालक

टॅग्स :Farmerशेतकरी