शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. 

ठळक मुद्देपालकांकडून २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी, परीक्षेचे स्वरूप स्पष्ट व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधी यामुळे यंदा दहावी, बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सत्रांत परीक्षेचा ताण  वाढला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. कोरोना संसर्गाने उडविलेल्या गोंधळामुळे शासनाने आधीच २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असल्याचे विविध शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेली माहिती आहे. ऑनलाईन शिक्षणालाही मर्यादा आहेत. किती मुले, किती वेळ सलग जॉईन होऊ शकतील, हाही प्रश्न आहे. दररोज विषय घेणे अवघड असल्याने दिवसाआड होणारे विषयाचे वर्ग,  उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम  पूर्ण करण्यात असलेली वेळेची अडचण या  नव्या समस्या उद्भवल्या आहेत. 

संभ्रम दूर व्हावाशासनाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या स्वरुपाबाबत संभ्रम आहे. वर्णनात्मक की एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थिहित लक्षात घेऊन ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी.- राजकन्या चवरे, पालक.

विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच नाही. यामुळे परीक्षेची मांडणी सुटसुटीत करावी. तामिळनाडूप्रमाणे शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा विचार करावा.- प्रकाश पाटील, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील प्रत्यक्ष संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यातील प्रश्नांची संख्या वाढवावी.- चुटकी रोकडे, दहावी

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा