शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

टोकन पद्धतीने टळली बाजार समितीतील गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था; अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचा घरात पडून राहिलेल्या कापसाच्या खरेदीकरिता पणन महासंघाने नोंदणीची प्रक्रिया राबविली. यामध्ये शनिवारी शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी आटोपल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही. खरीप पेरणीकरिता पैशाची तरतूद ते कापूस विकून करणार होते. मात्र, आता पणनची खरेदी बंद होती. शेतकऱ्यांची चिंता वाढल्याने पणनची खरेदी सुरू करण्यासाठी शासनाला साकडे घालावे लागले. जेमतेम खरेदीचे आदेश धडकले. तर एकदम शेतकऱ्यांची गर्दी होऊन आणखी लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन कोरोनाचा प्रकोप वाढेल, या भीतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदीकरिता आधी नोंदणी व तीदेखील मर्यादेत होईल, नंतर कापसाची खरेदी केली जाईल यासाठी ३ ते ६ जून दरम्यान प्रत्येक बाजार समितीत नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. अमरावती बाजार समितीत भातकुली, तिवसा व अमरावती या तीन तालुक्यांचा समावेश असल्याने स्थानिक बाजार समितीत आठ टेबलांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, गर्दीने उच्चांक गाठलाच. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे वृत्त झळकले. त्यामुळे प्रशासनाने अखेरच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता पाहता नोंदणीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भरलेला फॉर्म घेऊन तात्पुरते टोकन देणे सुरू केले. यामुळे फॉर्म तपासणी व पावती लिहून देण्याचा वेळ वाचला. परिणामी शेतकऱ्यांना अधिक वेळ रांगेत उभे न ठेवता आले तसेच तात्पुरते टोकन घेऊन फोनद्वारे खरेदीची तारीख कळविली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी नोंदणी दरम्यान होणारी गर्दी टळली.शनिवारी शेवटच्या दिवशी गर्दी राहील म्हणून शिदोरी घेऊन सकाळीच बाजार समिती गाठली. मात्र, येथे आल्याबरोबर नंबर लागल्याने त्रास वाचला.- प्रकाश लांडे, शेतकरी, भगवानपूरफोनद्वारे देणार शेतकऱ्यांना सूचनाशेतकºयांचा त्रास वाचविण्याकरिता तात्पुरते टोकन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टळली. प्राप्त झालेल्या फॉर्मची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करून त्यांना कापूस विक्रीकरिता केव्हा आणायचे, हे फोनद्वारे कळविले जाईल, असे अमरावती बाजार समितीचे निरीक्षक राजेश इंगोले यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी