शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

टोकन पद्धतीने टळली बाजार समितीतील गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था; अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचा घरात पडून राहिलेल्या कापसाच्या खरेदीकरिता पणन महासंघाने नोंदणीची प्रक्रिया राबविली. यामध्ये शनिवारी शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी आटोपल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही. खरीप पेरणीकरिता पैशाची तरतूद ते कापूस विकून करणार होते. मात्र, आता पणनची खरेदी बंद होती. शेतकऱ्यांची चिंता वाढल्याने पणनची खरेदी सुरू करण्यासाठी शासनाला साकडे घालावे लागले. जेमतेम खरेदीचे आदेश धडकले. तर एकदम शेतकऱ्यांची गर्दी होऊन आणखी लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन कोरोनाचा प्रकोप वाढेल, या भीतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदीकरिता आधी नोंदणी व तीदेखील मर्यादेत होईल, नंतर कापसाची खरेदी केली जाईल यासाठी ३ ते ६ जून दरम्यान प्रत्येक बाजार समितीत नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. अमरावती बाजार समितीत भातकुली, तिवसा व अमरावती या तीन तालुक्यांचा समावेश असल्याने स्थानिक बाजार समितीत आठ टेबलांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, गर्दीने उच्चांक गाठलाच. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे वृत्त झळकले. त्यामुळे प्रशासनाने अखेरच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता पाहता नोंदणीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भरलेला फॉर्म घेऊन तात्पुरते टोकन देणे सुरू केले. यामुळे फॉर्म तपासणी व पावती लिहून देण्याचा वेळ वाचला. परिणामी शेतकऱ्यांना अधिक वेळ रांगेत उभे न ठेवता आले तसेच तात्पुरते टोकन घेऊन फोनद्वारे खरेदीची तारीख कळविली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी नोंदणी दरम्यान होणारी गर्दी टळली.शनिवारी शेवटच्या दिवशी गर्दी राहील म्हणून शिदोरी घेऊन सकाळीच बाजार समिती गाठली. मात्र, येथे आल्याबरोबर नंबर लागल्याने त्रास वाचला.- प्रकाश लांडे, शेतकरी, भगवानपूरफोनद्वारे देणार शेतकऱ्यांना सूचनाशेतकºयांचा त्रास वाचविण्याकरिता तात्पुरते टोकन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टळली. प्राप्त झालेल्या फॉर्मची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करून त्यांना कापूस विक्रीकरिता केव्हा आणायचे, हे फोनद्वारे कळविले जाईल, असे अमरावती बाजार समितीचे निरीक्षक राजेश इंगोले यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी