लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचा घरात पडून राहिलेल्या कापसाच्या खरेदीकरिता पणन महासंघाने नोंदणीची प्रक्रिया राबविली. यामध्ये शनिवारी शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी आटोपल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही. खरीप पेरणीकरिता पैशाची तरतूद ते कापूस विकून करणार होते. मात्र, आता पणनची खरेदी बंद होती. शेतकऱ्यांची चिंता वाढल्याने पणनची खरेदी सुरू करण्यासाठी शासनाला साकडे घालावे लागले. जेमतेम खरेदीचे आदेश धडकले. तर एकदम शेतकऱ्यांची गर्दी होऊन आणखी लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन कोरोनाचा प्रकोप वाढेल, या भीतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदीकरिता आधी नोंदणी व तीदेखील मर्यादेत होईल, नंतर कापसाची खरेदी केली जाईल यासाठी ३ ते ६ जून दरम्यान प्रत्येक बाजार समितीत नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. अमरावती बाजार समितीत भातकुली, तिवसा व अमरावती या तीन तालुक्यांचा समावेश असल्याने स्थानिक बाजार समितीत आठ टेबलांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, गर्दीने उच्चांक गाठलाच. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे वृत्त झळकले. त्यामुळे प्रशासनाने अखेरच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता पाहता नोंदणीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भरलेला फॉर्म घेऊन तात्पुरते टोकन देणे सुरू केले. यामुळे फॉर्म तपासणी व पावती लिहून देण्याचा वेळ वाचला. परिणामी शेतकऱ्यांना अधिक वेळ रांगेत उभे न ठेवता आले तसेच तात्पुरते टोकन घेऊन फोनद्वारे खरेदीची तारीख कळविली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी नोंदणी दरम्यान होणारी गर्दी टळली.शनिवारी शेवटच्या दिवशी गर्दी राहील म्हणून शिदोरी घेऊन सकाळीच बाजार समिती गाठली. मात्र, येथे आल्याबरोबर नंबर लागल्याने त्रास वाचला.- प्रकाश लांडे, शेतकरी, भगवानपूरफोनद्वारे देणार शेतकऱ्यांना सूचनाशेतकºयांचा त्रास वाचविण्याकरिता तात्पुरते टोकन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टळली. प्राप्त झालेल्या फॉर्मची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करून त्यांना कापूस विक्रीकरिता केव्हा आणायचे, हे फोनद्वारे कळविले जाईल, असे अमरावती बाजार समितीचे निरीक्षक राजेश इंगोले यांनी सांगितले.
टोकन पद्धतीने टळली बाजार समितीतील गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST
यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही.
टोकन पद्धतीने टळली बाजार समितीतील गर्दी
ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था; अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी