उन्हाळी कांद्याने रडविले; लागवडीचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:25 IST2021-02-09T14:25:24+5:302021-02-09T14:25:53+5:30

Amravati News चांदूर बाजार तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड संपणार आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

Cried the summer onion; The cost of cultivation increased | उन्हाळी कांद्याने रडविले; लागवडीचा खर्च वाढला

उन्हाळी कांद्याने रडविले; लागवडीचा खर्च वाढला

ठळक मुद्देकांदा लागवड अंतिम टप्प्यात

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड संपणार आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. त्यात आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

             तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात येते. काजळी, देऊरवाडा, माधान, कोदोरी, जसापूर, पिंपरी पूर्णा, थुगाव, निंभोरा या भागांत सर्वाधिक कांदा लागवड होते. या भागात ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेती नाही, त्यांनीदेखील कांदा लागवडीसाठी शेती लागवणने घेतले आहे. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी ५०० ते ६०० रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांद्या बियाणाच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला कमीत कमी १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली, तर कांद्याला अपेक्षित भाव निश्चित मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याला यंदाचा लागवडीचा खर्च ५० हजारांच्या घरात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे. खत, फवारणी, रासायनिक औषधींच्या वाढलेल्या दरामुळेदेखील शेतकरी हैराण आहेत. विशेष म्हणजे, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या तयारीत असणाऱ्या अनेक युवकांनी कांदा लागवड करून आपला कल शेतीकडे वळविला आहे.

निर्यात धोरण आडमुठे

जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा होता तेव्हा शासनाने निर्यात बंद केली. जेव्हा कांदा संपला तेव्हा निर्यात सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे उन्हाळी कांदा लागवडीने यंदा शेतकऱ्यांना रडू आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

-------------

Web Title: Cried the summer onion; The cost of cultivation increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा