शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

दोन तालुक्यांच्या निर्मितीवर अचलपूर जिल्ह्याची मदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:26 PM

अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.

ठळक मुद्देमागणीला ३८ वर्षे पूर्ण : राजकीय पाठपुराव्याची निकड, आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी प्रशासकीय स्तरावरून सन २०१५ मध्ये शासनाकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यात अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी या पाच तालुक्यांसह आसेगाव पूर्णा आणि चुरणी या प्रस्तावित तालुक्यांचा संभाव्य अचलपूर जिल्ह्यात समावेश आहे. खरे तर अचलपूर जिल्हा व्हावा, ही मागणी १९८० ची आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख, हरिशंकर अग्रवाल आणि काँग्रेसच्या अन्य मंडळीने त्यावेळी या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदन दिले. याच दरम्यान नागरिक व लोकप्रतिनिधींची सर्वपक्षीय नागरिक कृती समितीही गठित करण्यात आली होती. तत्कालीन एसडीओ खान यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना तत्कालीन विधान परिषद सदस्य वसुधा देशमुख सदनातच उपोषणाला बसल्या होत्या. १५ डिसेंबर १९९८ ला तारांकित प्रश्न ३०,५४० ला अनुसरून आ. बी.टी. देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. तीन टर्मपासून अपक्ष म्हणून आ. बच्चू कडू विधानसभेत अचलपूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांच्या पाठपुराव्यासही यश आलेली नाही. अचलपूर जिल्ह्याकरिता विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार युवाशक्तीने ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ ला अचलपूर एसडीओ कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यानंतर ८ नोव्हेंबरपासून तब्बल ४२ दिवस साखळी उपोषण केले. १५५ गावातील युवकांनी यात सहभाग दिला. सात हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. पुढे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्ह्यासह १९ मागण्यांकरिता २२ सप्टेंबर २००८ रोजी नागरवाडीत अन्नत्याग आंदोलन केले होते. २००५ पूर्वी मे १९९९ मध्ये तत्कालीन एसडीओ नितीन पाटील यांनीही शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.मुघलकाळात अचलपूर होती राजधानीमुघल काळात अचलपूर हे राजधानीचे शहर होते. त्यावेळी एलिचपूर असे या शहराचे नाव होते. सीपी अँड बेरार प्रांत अस्तित्वात असतानादेखील अचलपूर जिल्हा होता. अचलपूर शहराला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. अचलपूर जिल्हा झाल्यास मेळघाटचे कुषोपण, बाल-माता मृत्यूवर नियंत्रण मिळविणे सुकर होईल. विदभार्तील काही मोजक्याच ‘अ’ वर्ग नगरपालिकांपैकी अचलपूर एक आहे. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या जिल्हा निर्मितीसाठी सर्वच सुविधा अचलपूरला प्राप्त आहेत. केवळ जिल्हा निर्मितीची शासनाकडून घोषणा होणे बाकी आहे.शासनकर्ते बदलताच विषय पडतो मागेविकासात्मकदृष्ट्या मागासलेपण आणि पायाभूत सुविधांचा अभाव अशा कारणांचा अंतर्भाव अचलपूर जिल्हा निर्मितीमागे होत असतो. मात्र, शासनकर्ते बदलताच अचलपूर जिल्हानिर्मितीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे. अचलपूर जिल्हानिर्मितीच्या प्रस्तावात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांचा समावेश आहेच तसेच चुर्णी व आसेगाव या दोन तालुक्यांचादेखील प्रस्ताव राहणार आहे. जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने अचलपुरात प्रशासकीय इमारतींसह आरोग्य, शिक्षण, सार्वत्रिक सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत. परंतु, प्रशासकीय बोजा वाढण्याच्या भीतीने राज्य शासन या विषयाला बगल देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अमरावती जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. अमरावतीचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती करणे लोकहित व विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आमदार होण्यापूर्वीपासून मी याकरिता प्रयत्नशील आहे. आमदार असताना विधानभवनात मी याकरिता उपोषणास बसले होते. यादरम्यान सभापतींनी सभागृहात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आश्वस्त केले होते. यानंतर दोन नवीन जिल्हे निर्माण केले गेलेत. मात्र, अचलपूरकडे दुर्लक्ष केले गेले. अचलपूर जिल्हा व्हावा, हीच अपेक्षा.- वसुधाताई देशमुख, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार, अचलपूर.राज्यात जेव्हा नवीन जिल्हे निर्मित केले जातील तेव्हा अचलपूर जिल्हा अग्रक्रमाने केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे. त्याआधी आसेगाव पूर्णा आणि चुरणी तालुके केल्या जातील. अचलपूर जिल्हा व्हावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.- बच्चू कडूआमदार, अचलपूर.अचलपूर जिल्हा निर्मितीबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अपेक्षित खर्चही प्रस्तावात नमूद आहे. सध्या अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने शासनाकडून कुठलीही विचारणा नाही. प्रस्तावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही.- डॉ. व्यंकट राठोडउपविभागीय अधिकारी