शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

Coronavirus in Amravati; अमरावतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, व्यक्तींचा मुक्त वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 8:51 AM

Amravati news कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे.

ठळक मुद्देसंक्रमितांच्या संपर्कातील यंत्रणेद्वारे फक्त लिखापोती

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे. फक्त लिखापोती सुरू असताना प्रशासनाच्या लेखी एका रुग्णामागे ८ ते १० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

प्रत्येक रुग्णामागे किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश असताना जिल्ह्यात हा प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे. संसर्गाचे भीतीपोटी नागरिकच स्वत:हून कोरोनाच्या चाचण्या करीत आहेत. मात्र, चाचण्या टाळण्याचा प्रकार जेथे घडला त्या ठिकाणी कुटुंबचे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचण्या केल्यास अटकाव करता येतो. चाचण्या न करता लक्षणे अंगावर काढल्याचा प्रकार अंगलटदेखील आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याच्या अनेक घटनांमध्ये अन्य कारणांसोबत अंगावर दुखणे काढणे हे एक प्रमुख कारण आहे.

संक्रमितांच्या १५ फुटांच्या आत वावरणाऱ्या व्यक्तीने जर मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नसेल, तर अशा व्यक्ती जोखीम या गटात मोडतात. या सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्याच्या दोन-तीन दिवसांत कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना संपर्काविषयी विचारणा व्हायची, ही व्यक्ती कुठे-कुठे गेली, याविषयीची चौकशी होऊन आरोग्य विभागाचे पथक त्या घरी पोहोचून आरोग्यविषयक माहिती घ्यायचे व त्या परिवारातील सदस्यांना चाचण्या करण्याची सूचना दिली जात होती. आशा व एएनएम पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र हा प्रकार नावालाच आहे. शहर असो की ग्रामीण कुठेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढण्याचे हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.

‘ब्रेक द चेन’साठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे

घरातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास त्या घरातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे. याचे गांभीर्य लक्षात आल्याने शहरात आता संक्रमितांच्या कुटुंबातील व्यक्ती चाचण्या करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अद्यापही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार होत नाही किंबहुना आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४,५७.४९८ चाचण्या

जिल्ह्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजनच्या आतापर्यंत ४,५७,४९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६.४८ पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आली आहे. मार्च व एप्रिलमध्ये रोज उच्चांकी आठ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत होत्या. आता मात्र हे प्रमाण साडेतीन ते चार हजारांपर्यंतच आहे व चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह नोंद होण्याचे प्रमाण २३ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.

जिल्ह्यात एका रुग्णामागे आठ ते १२ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. संक्रमितांच्या परिवारातील व्यक्तींना चाचण्या करण्याविषयीची सूचना केली जाते.

डॉ. दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस