शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मेळघाटसारख्या दुर्गम भागातही कोरोनाने पसरले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 9:16 AM

मेळघाटात लोकांना कोरोना होत नाही. येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त आहे , त्यामुळे कोरोना जवळपास भटकू शकत नाही, असा अतिआत्मविश्वासाचा दावा येथील काहीजण करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात धारणी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरल्याची वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देलोकांमध्ये गंभीरता नाहीसामाजिक अंतर, मास्कला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात लोकांना कोरोना होत नाही. येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त आहे , त्यामुळे कोरोना जवळपास भटकू शकत नाही, असा अतिआत्मविश्वासाचा दावा येथील काहीजण करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात धारणी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरल्याची वस्तुस्थिती आहे.आजमितीस अनेक लोकांनी सामाजिक अंतर ठेवणे टाळले असून अनेकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे सुद्धा बंद केले आहे. परिणामी कोरोनाने येथील सर्वसामान्यांवर आक्रमण केल्याचे चित्र आता हळूहळू दिसू लागले आहे .

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारणी तालुक्यात आतापर्यंत ५५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचेवर स्थानिक कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. धारणी शहरात बाधित काही रुग्णांनी बाहेर गावी जाऊन उपचार घेतले. स्थानिक एक व्यावसायिकाला कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे अकोला येथे उपचार सुरु होते.गेल्या आठवड्यात त्यांचा तेथेच मृत्यू झाला. अंतिमसंस्कार अकोला येथे करण्यात आले आहे. शहरात याची वाच्यता झाली नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन तरी तालुका व शहरवासियांनी सजग राहणे आवश्यक झाले आहे.ताप, सर्दी, खोकला झाल्यास कोविड सेंटर येथे येऊन तपासणी करून घेण्याचे निवेदन वारंवार करण्यात येत आहे. धारणीत कोरोना तपासणीचे प्राथमिक निदान करण्यात येऊन त्यांचेवर योग्य उपचार केल्यानंतर सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे योग्य वेळी दखल घेऊन स्वत:हून तपासणी केल्यास रोगमुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत ५५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.- शशिकांत पवारतालुका आरोग्य अधिकारी, धारणी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस