शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कोरोना संक्रमण; ६० दिवसात ६३ भागांमध्ये एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : शहरात ५३, जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात १० भागांमध्ये शिरकाव

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात ३ एप्रिलला हाथीपुरा भागातून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ५३ भागांमध्ये पोहोचलां. जिल्हा ग्रामीणमध्येही १० भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. या ६० दिवसांत नव्या ६३ भागांमध्ये झालेले कोरोनाचे संक्रमण ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. रोज नव्या भागात कोरोना संक्रमितांची नोंद होत असल्याने आता समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे.जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कुठून झाला, हे गुलदस्त्यात राहिले. त्यानंतर काही दिवस हैदरपुरा, कमेला ग्राऊंड, पाटीपुरा, तारखेड आदी भागांपुरतेच कोरोनाचे संक्रमण राहीले. पहिल्या २० दिवसांत १६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये पाच संक्रमितांची होम डेथ झाली, तर चार व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. या भागात कोरोनाचे ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ तयार झाले. महापालिका प्रशासनाने कंटेनमेेंट झोन तयार केलेत. मात्र, अंमलबजावणी प्रभावी झालेली नसल्याने प्रादुर्भाव वाढताचा राहिला आहे. पोलीस यंत्रणेचे दुर्लक्षदेखील तेवढेच कारणीभूत ठरले. यानंतरच्या २० दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव २८ भागांत पोहोचला. यामध्ये शहरात २४ व ग्रामीणमध्ये चार भागांत ७४ संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मृत्यूचेही प्रमाण वाढले. पहिल्या ४० दिवसांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५६ व्यक्ती पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेत. यानंतर मात्र शहराच्या अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात कोरोना शिरकाव झाला. आता तर मसानगंज, फ्रेझरपूरा, रतनगंज हे भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनल्याने प्रशासन, नागरिकांची चिंता वाढली आहे.धक्कादायक; २० दिवसांत १७४ रुग्णअलिकडच्या २० दिवसांत जिल्ह्यात १७४ रुग्णांची नोंद झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. त्याचसोबत आतापर्यंत ६० भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. रुग्णसंख्या वाढत असताना, बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला. या कालावधीत दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर ७२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यात. आरोग्य मंत्रालयाद्वारा ९ मे रोजीच्या गाइड लाइनमुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लक्षणे नसल्यास दहा दिवसांत रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होत आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.काही कंटेनमेंट अलीकडे संक्रमित रुग्णाची नोंद नसल्याने निरस्त करण्यात आले. काही भागांमध्ये संक्रमितांची संख्या वाढती आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता तीन खासगी रुग्णालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या