शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

कोरोना संक्रमण; ६० दिवसात ६३ भागांमध्ये एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : शहरात ५३, जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात १० भागांमध्ये शिरकाव

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात ३ एप्रिलला हाथीपुरा भागातून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ५३ भागांमध्ये पोहोचलां. जिल्हा ग्रामीणमध्येही १० भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. या ६० दिवसांत नव्या ६३ भागांमध्ये झालेले कोरोनाचे संक्रमण ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. रोज नव्या भागात कोरोना संक्रमितांची नोंद होत असल्याने आता समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे.जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कुठून झाला, हे गुलदस्त्यात राहिले. त्यानंतर काही दिवस हैदरपुरा, कमेला ग्राऊंड, पाटीपुरा, तारखेड आदी भागांपुरतेच कोरोनाचे संक्रमण राहीले. पहिल्या २० दिवसांत १६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये पाच संक्रमितांची होम डेथ झाली, तर चार व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. या भागात कोरोनाचे ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ तयार झाले. महापालिका प्रशासनाने कंटेनमेेंट झोन तयार केलेत. मात्र, अंमलबजावणी प्रभावी झालेली नसल्याने प्रादुर्भाव वाढताचा राहिला आहे. पोलीस यंत्रणेचे दुर्लक्षदेखील तेवढेच कारणीभूत ठरले. यानंतरच्या २० दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव २८ भागांत पोहोचला. यामध्ये शहरात २४ व ग्रामीणमध्ये चार भागांत ७४ संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मृत्यूचेही प्रमाण वाढले. पहिल्या ४० दिवसांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५६ व्यक्ती पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेत. यानंतर मात्र शहराच्या अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात कोरोना शिरकाव झाला. आता तर मसानगंज, फ्रेझरपूरा, रतनगंज हे भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनल्याने प्रशासन, नागरिकांची चिंता वाढली आहे.धक्कादायक; २० दिवसांत १७४ रुग्णअलिकडच्या २० दिवसांत जिल्ह्यात १७४ रुग्णांची नोंद झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. त्याचसोबत आतापर्यंत ६० भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. रुग्णसंख्या वाढत असताना, बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला. या कालावधीत दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर ७२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यात. आरोग्य मंत्रालयाद्वारा ९ मे रोजीच्या गाइड लाइनमुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लक्षणे नसल्यास दहा दिवसांत रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होत आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.काही कंटेनमेंट अलीकडे संक्रमित रुग्णाची नोंद नसल्याने निरस्त करण्यात आले. काही भागांमध्ये संक्रमितांची संख्या वाढती आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता तीन खासगी रुग्णालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या