शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बाजार समितीसाठी काँग्रेस विभागली, भाजपमध्येही गटबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:29 IST

वरूड बाजार समितीसाठी सहकारातील दोन पॅनलमध्ये थेट लढतीची शक्यता

वरूड (अमरावती) : सहकारात प्रतिष्ठित केलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला, तर भाजपमध्येही गटबाजी झाली आहे. यामध्ये काँग्रेस (ठाकरे गट) आणि भाजपचे सहकार पॅनेल तसेच काँग्रेस (कराळे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी परिवर्तन पॅनेल आमनेसामने आहे. यासाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

२३ नोव्हेंबर १९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बाजार समितीचे सहकारातील अन्य गटांनी नेतृत्व केले असले तरी बहुतांश वेळा काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचीच सत्ता राहिली आहे. दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हर्षवर्धन देशमुख यांच्या गटाने सत्ता मिळविली. कॉंग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे गटाकडेही दहा वर्षे कार्यकाळ राहिला आहे. बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी ५४ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. यामध्ये उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर म्हणजेच २० एप्रिलनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सहकारात गटा-तटात विभागलेल्या पक्षांनी आता मतदारांच्या भेटीगाठी, गृहभेटी सुरू केल्या आहेत. बाजार समितीमध्ये १७१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६०६ मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात, ६६७ सेवा सोसायटी, ६९ मापारी हमाल आणि ३७५ व्यापारी मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात अटीतटीच्या व अस्तित्वाच्या लढतीत कोण बाजी मारणार हे ३० एप्रिलच्या मतदानानंतर ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या सहभागाने होईल विकास

शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेली बाजार समिती आता आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली आहे. बाजार समितीपासून सर्वसामान्य शेतकरी कोसोदूर आहे. त्यामुळे उत्पादित कृषी मालावर आधारित प्रकल्प सुरू केल्यास बाजार समितीला सुगीचे दिवस येतील, असे माजी जि.प सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्रोत वाढविणार केव्हा?

पुर्वी जिनिंग प्रेसिंग, भाजीपाला फळे, संत्रा, कापूस मार्केट अशा विविध मार्गाने बाजार समितीला सेस मिळायचा. परंतु शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती केली. सोबतच अन्य स्रोतही बंद केल्याने बाजार समिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे महत्त्वाचे असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले.

कॉंग्रत्चा एक गट भाजपासोबत, दुसरा राष्ट्रवादीकडे!

तालुक्यात कॉंग्रेसचे दोन गट असून नरेशचंद्र ठाकरे गटाने भाजपचे खा. अनिल बोंडे गटाशी हातमिळवणी केलेली आहे तर गिरीश कराळे गट हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांच्या राकाँ गटासोबत आहे. भाजपतदेखील गटबाजी असून एक गट नाराज असल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसBJPभाजपा