शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बाजार समितीसाठी काँग्रेस विभागली, भाजपमध्येही गटबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:29 IST

वरूड बाजार समितीसाठी सहकारातील दोन पॅनलमध्ये थेट लढतीची शक्यता

वरूड (अमरावती) : सहकारात प्रतिष्ठित केलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला, तर भाजपमध्येही गटबाजी झाली आहे. यामध्ये काँग्रेस (ठाकरे गट) आणि भाजपचे सहकार पॅनेल तसेच काँग्रेस (कराळे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी परिवर्तन पॅनेल आमनेसामने आहे. यासाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

२३ नोव्हेंबर १९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बाजार समितीचे सहकारातील अन्य गटांनी नेतृत्व केले असले तरी बहुतांश वेळा काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचीच सत्ता राहिली आहे. दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हर्षवर्धन देशमुख यांच्या गटाने सत्ता मिळविली. कॉंग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे गटाकडेही दहा वर्षे कार्यकाळ राहिला आहे. बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी ५४ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. यामध्ये उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर म्हणजेच २० एप्रिलनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सहकारात गटा-तटात विभागलेल्या पक्षांनी आता मतदारांच्या भेटीगाठी, गृहभेटी सुरू केल्या आहेत. बाजार समितीमध्ये १७१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६०६ मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात, ६६७ सेवा सोसायटी, ६९ मापारी हमाल आणि ३७५ व्यापारी मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात अटीतटीच्या व अस्तित्वाच्या लढतीत कोण बाजी मारणार हे ३० एप्रिलच्या मतदानानंतर ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या सहभागाने होईल विकास

शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेली बाजार समिती आता आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली आहे. बाजार समितीपासून सर्वसामान्य शेतकरी कोसोदूर आहे. त्यामुळे उत्पादित कृषी मालावर आधारित प्रकल्प सुरू केल्यास बाजार समितीला सुगीचे दिवस येतील, असे माजी जि.प सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्रोत वाढविणार केव्हा?

पुर्वी जिनिंग प्रेसिंग, भाजीपाला फळे, संत्रा, कापूस मार्केट अशा विविध मार्गाने बाजार समितीला सेस मिळायचा. परंतु शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती केली. सोबतच अन्य स्रोतही बंद केल्याने बाजार समिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे महत्त्वाचे असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले.

कॉंग्रत्चा एक गट भाजपासोबत, दुसरा राष्ट्रवादीकडे!

तालुक्यात कॉंग्रेसचे दोन गट असून नरेशचंद्र ठाकरे गटाने भाजपचे खा. अनिल बोंडे गटाशी हातमिळवणी केलेली आहे तर गिरीश कराळे गट हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांच्या राकाँ गटासोबत आहे. भाजपतदेखील गटबाजी असून एक गट नाराज असल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसBJPभाजपा