शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालये बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST

खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे २५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अमरावती : खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे २५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला तडा जाऊ नये, याकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सोमवारी सकाळपासून शहरातील शाळा-महाविद्यालये बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
माहितीनुसार, संविधान कलम ३४० नुसार एससी, एसटी प्रमाणेच ओबीसी वर्गवारीला समान अधिकार देण्याची घोषणा झाली होती. आतापर्यंत ओबीसींना विविध क्षेत्रात आरक्षण व शिक्षण सुविधांचा लाभ मिळत होता. मात्र सत्ता परिवर्तन होताच राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी ३८० कोटींचा खर्च शासनाकडून केला जात होता. मात्र हा खर्च वाचविण्यासाठी ओबीसीची शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर बांठिया समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती स्थगित करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, विद्यार्थ्यांना २०११ पासूनची ११०० कोटींची थकबाकी परत द्यावी, पालकांना आयकरमध्ये सहा लाखांपर्यंतची सूट द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (८ डिसेंंबर) शाळा-महाविद्यालये बंदचे आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून आंदोलन सुरु करण्यात आले. मात्र शाळा-महाविद्यालयांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. समता परिषेदच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन विनंती केली. आंदोलनात विभागीय अध्यक्ष बाबुराव बेलसरे, गणेश खारकर, संजय मापले, भूषण गवई, प्रवीण मेटकर, अंबाडकर, नितीन इंगोले, मीना बखाडे, सुनील वासनकर आदी उपस्थित होते.