शेतमाल खरेदी हे सरकारचे काम नव्हे -सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:28 IST2017-08-14T05:28:16+5:302017-08-14T05:28:20+5:30

शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे

Commodity purchase is not the work of the government - Sumitra Mahajan | शेतमाल खरेदी हे सरकारचे काम नव्हे -सुमित्रा महाजन

शेतमाल खरेदी हे सरकारचे काम नव्हे -सुमित्रा महाजन

अमरावती : शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करतात. पण शासनाचे काम नियोजनाचे आहे, विकत घेण्याचे नव्हे, हे शेतकºयांनी समजून घ्यावे आणि शेतीवरच अवंलबून न राहता शेतीपूरक व्यवसायालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी अमरावतीत केले.
वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करीत असतात; परंतु महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण देशभरात नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसºया राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. विकास महात्मे, सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.
या वेळी प्रतीक्षा लोणकर (अभिनय), रजनी पंडित (समाजसेवा), प्रज्ञा पाटील (क्रीडा), कल्पना दिवे (उद्योजिका) यांचा स्मृतिचिन्ह, घोंगडी देऊन अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार-२०१७ ने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Commodity purchase is not the work of the government - Sumitra Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.