शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची बैलजोडीसह धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:26 IST

महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : बैलमालकांना भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बैलजोडी मालकांना शंभर टक्के नुकसानभरपाई आणि दोषी अभियंता, कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी बैलजोडीसह कॅम्प स्थित महावितरणच्या ‘प्रकाश भवन’वर धडक दिली. यावेळी अधीक्षक अभियंत्यांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी करण्यात आली.महावितरणच्या गैरकारभारामुळे ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करणारे खांब वाकल्याने वीजवाहक तारा झुकल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर उघडे पडले आहे. शेत रस्ते, पांदण रस्त्याच्या कडेने जाणाºया तारा जमिनीला टेकल्या आहेत. शेतात कृषिपंपाचे संबंधित कंत्राटदारांनी पोल अत्यंत थातूरमातूर उभे केले. परिणामी कित्येक ठिकाणी जिवंत तारा तुटण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेती व शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात लखाड व पूर्णानगर येथे पेरणीच्या हंगामात शेतकºयांच्या बैलजोडीचा मूत्यू जिवंत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. या सर्व प्रकाराला महावितरण कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे या घटनांना जबाबदार अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्त बैलमालकांना शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, लोंबकलेल्या, तुटलेल्या जिवंत वीजवाहिन्या तसेच उघड्या डीबीची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसने अधीक्षक अभियंत्यांना केली.संप्तत शेतकºयांनी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या हातात बैलजोड्यांचे दोर सोपविले आणि आता तुम्हीच त्यांचे पालनपोषण करा, असे म्हणाले. आंदोलनात शेखर अवघड, शशिकांत बोंडे, अनिकेत ढेंगळे, समीर जवंजाळ, गणेश कडू, उमेश महिंगे, गौतम दाभाडे, सुनील अग्रवाल, सुधीर बोबडे, वहीद काजी उपस्थित होते.तारा तुटल्याने शेती पडीकगोपाळपूर सालोरा येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे किटुकले नामक शेतकºयाची दोन एकर शेती पडीक आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीजतारांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न आमला सालोरा येथील महेश दिवाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना केला.

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण