शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची बैलजोडीसह धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:26 IST

महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : बैलमालकांना भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बैलजोडी मालकांना शंभर टक्के नुकसानभरपाई आणि दोषी अभियंता, कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी बैलजोडीसह कॅम्प स्थित महावितरणच्या ‘प्रकाश भवन’वर धडक दिली. यावेळी अधीक्षक अभियंत्यांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी करण्यात आली.महावितरणच्या गैरकारभारामुळे ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करणारे खांब वाकल्याने वीजवाहक तारा झुकल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर उघडे पडले आहे. शेत रस्ते, पांदण रस्त्याच्या कडेने जाणाºया तारा जमिनीला टेकल्या आहेत. शेतात कृषिपंपाचे संबंधित कंत्राटदारांनी पोल अत्यंत थातूरमातूर उभे केले. परिणामी कित्येक ठिकाणी जिवंत तारा तुटण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेती व शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात लखाड व पूर्णानगर येथे पेरणीच्या हंगामात शेतकºयांच्या बैलजोडीचा मूत्यू जिवंत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. या सर्व प्रकाराला महावितरण कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे या घटनांना जबाबदार अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्त बैलमालकांना शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, लोंबकलेल्या, तुटलेल्या जिवंत वीजवाहिन्या तसेच उघड्या डीबीची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसने अधीक्षक अभियंत्यांना केली.संप्तत शेतकºयांनी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या हातात बैलजोड्यांचे दोर सोपविले आणि आता तुम्हीच त्यांचे पालनपोषण करा, असे म्हणाले. आंदोलनात शेखर अवघड, शशिकांत बोंडे, अनिकेत ढेंगळे, समीर जवंजाळ, गणेश कडू, उमेश महिंगे, गौतम दाभाडे, सुनील अग्रवाल, सुधीर बोबडे, वहीद काजी उपस्थित होते.तारा तुटल्याने शेती पडीकगोपाळपूर सालोरा येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे किटुकले नामक शेतकºयाची दोन एकर शेती पडीक आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीजतारांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न आमला सालोरा येथील महेश दिवाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना केला.

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण