शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

ग्रामीण भागात अ‍ॅपने स्वच्छता सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:15 IST

केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षणातून घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामस्थांनी एसएसजी १८ हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आपली स्वच्छतेबाबतची मते व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान देशभरात एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार आहे.

ठळक मुद्दे३० आॅगस्टपर्यंत मुदत : ग्रामस्थांना नोंदवावी लागणार प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षणातून घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामस्थांनी एसएसजी १८ हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आपली स्वच्छतेबाबतची मते व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान देशभरात एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामस्थांनीसुद्धा या अ‍ॅपवर आपली मते व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्व गावांतील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता निरीक्षण, ग्रामस्थांची स्वच्छताविषयक आॅनलाइन अभिप्राय आणि स्वच्छताविषयक सद्यस्थिती या तीन मानकांच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख भाग म्हणजे, यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्याचे आणि राज्याचे स्वच्छता आणि क्रमवारी निश्चित होणार आहे.एसएसजी १८ मोबाइल अ‍ॅपवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच तालुका व जिल्हा परिषदेच्या सर्व आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, स्थानिक स्तरावरील तसेच महाविद्यालयस्तरावर युवक मंडळ, बचतगट यांनी प्रतिक्रिया नोंदवावी तसेच आपले गाव, ग्रामपंचायत स्वच्छ सुंदर करण्याच्या प्रयत्नात सर्वांगाने झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या उपक्रमात मोठा लोकसहभाग अपेक्षित आहे.मागविण्यात येणाऱ्या प्रतिक्रियास्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ बद्दल माहिती आहे का ?एसबीएम अंमलबजावणीसह तुमच्या गावातील सर्वसाधारण स्वच्छतेत किती सुधारणा झालेली आहे?घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गावपातळीवर व्यवस्था केली गेली आहे का?ओला कचरा साठी दूषित पाण्यासाठी गावपातळीवर व्यवस्था आहे?अ‍ॅपचा आग्रह का?आजही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्ते, वीज या समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणी आजही दूरध्वनी व इंटरनेट अनेकांजवळ साधे मोबाइल असून, त्याची इंटरनेट सुविधा नाही. अशा भागातील नागरिक खरच हे अ‍ॅप डाऊनलोड करतील का व त्यावर खरोखर सर्वेक्षण करू शकतील का, असा प्रश्न आहे.