शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

५वीपर्यंत वर्ग, २ शिक्षक अन् विद्यार्थी फक्त एक, मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?

By गणेश वासनिक | Updated: March 4, 2024 10:48 IST

अमरावती : ४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असले तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा ...

अमरावती : ४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असले तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दुर्गम भागातील माडीझडप येथे पाहायला मिळत आहे.  या गावातील मुले गेली कुठे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

विदर्भाचे नंदनवन म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील माडीझडप हे आदिवासीबहुल गाव आहे. रोजगाराअभावी येथील आदिवासी कुटुंबीय स्थलांतर करीत असल्याचे वास्तव आहे. याचा फटका त्यांच्या मुलाबाळांना बसतो. माडीझडप येथील शाळा ही अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आवागड या केंद्राशी जोडलेली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत या शाळेत वर्ग असून, दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक गावातच मुक्कामी राहतात, तर एक शिक्षक बाहेरगावहून ये-जा करतात  

शाळा अन् विद्यार्थी वाचवामेळघाटात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज नाही. पाणी नाही. पायाभूत सुविधा नाही. हळूहळू मेळघाटातून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत. गत महिन्याभरापूर्वी माडीझडप शाळेत भेट दिली असता, पटावर एकच विद्यार्थिनी पहिल्या वर्गात असल्याचे दिसून आले. 

पहिली ते पाचवीपर्यंत येथे वर्ग असून, दोन शिक्षक आहेत. राजकीय नेते, पालक, प्रशासन आणि समाजाने देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया खोज संस्थेचे बंड्या साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

माडीझडप शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी पालकांनी दोन विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत पाठविले होते. मात्र, आता ते दोन विद्यार्थी परतले. सध्या तीन विद्यार्थी, दोन शिक्षक अशी या शाळेची रचना आहे.    - रामेश्वर माळवे, खंडविकास अधिकारी, चिखलदरा

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक