शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

छत्री तलाव आजही भागवतोय उमरावतीची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:24 IST

दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.अमरावती शहरालगतच्या छत्री तलावाची निर्मिती सन १८८८ साली झाली. दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावेळी २ लाख ३६ हजार रुपये खर्चून इंग्रजांनी हा तलाव तयार केला होता. पूर्वीच्या उमरावती शहरातील लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी छत्री तलाव सक्षम होता. तलावाचे पाणी शहराला पुरविता यावे, या उद्देशाने १८९०-९१ मध्ये मोठी पाइप लाइन टाकण्यात आली होती. छत्री तलावापासून ती पाइप लाइन राजापेठ व अंबापेठपर्यंत गेल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. त्यावेळी याच पाईप लाईनवर नळ बसविण्यात आले होते. विविध परिसरातून जाणाºया या पाइप लाइनवरील नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आजही या नळातून पाणीपुरवठा केला जात असून, छत्री तलावालगतच्या परिसरातील नागरिक पाण्याचा उपयोग करीत आहेत. याशिवाय या तलावाची पाण्यामुळे जेवडनगर, फर्शी स्टॉप, कलोतीनगर, दस्तुरनगर, बेनोडा आदी परिसरातील जलपातळी राखण्यास मोठी मदत मिळाली आहे. भविष्यात जलसंकट गडद झाल्यास या तलावाचा उपयोग होणार आहे.शुद्धीकरण केंद्र सुरू करावेछत्री तलावातील पाण्याचा वापर आजही होत आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणी मिळत आहे. आगामी संकटकाळात छत्री तलाव उपयोगी पडेल. तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून पाइप लाइन व सयंत्राचे नूतनीकरण केल्यास शहरातील काही परिसरात पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती स्थानिक रहिवासी नीलेश कंचनपुरे यांनी दिली.पाण्याची पातळी वाढविण्यास मदतछत्री तलावातील पाणी पंचवीस हजार लोकसंख्येला पुरेल, या अंदाजाने तो बनविण्यात आला. दररोज पाच लाख गॅलन पाणी शहरास देता देईल, असा अंदाज होता. तलाव पूर्ण भरल्यास, त्यात सव्वा तीन लाख गॅलन इतक्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो; दीड वर्ष पाणी पुरेल, असा अंदाज होता. याशिवाय तलाव भरण्यासाठी एकावेळी सतत चोवीस तास सात ते नऊ इंचापर्यंत पाऊस पडणे अपेक्षित होते. तरीदेखील त्यावेळी या तलावाने नागरिकांना बराच दिलासा दिला. आजही छत्री तलावातील पाण्याने आजूबाजूच्या परिसरातील पातळी राखून ठेवली आहे.छत्री तलावाचा इतिहाससन १८८८ साली उमरावती नावाने ओळखल्या जाणाºया अमरावती शहरास पूर्वी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कालांतराने ब्रिटिशांनी तलाव तयार केल्यानंतर त्या पाण्याचा वापर सुरू झाला. पूर्वी कालापानी तलाव नावाने ओळखल्या जाणाºया या तलावावर छत्री बांधण्यात आली. तेव्हापासून छत्री तलाव नावारूपास आले. शहराच्या पूर्वकडील टेकड्यांचा आश्रय घेऊन व तेथून वाहणाºया नाल्याचे पाण्याचा प्रवाह तलावाच्या पोटात राहील, अशा रीतीने हा तलाव बांधण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी मातीचा भराव टाकून पाळ बांधण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी मोठा पाइप पाळेच्या खालून बाहेर काढलेला आहे. तेथेच छत्री बांधण्यात आली. या छत्रीखालीच पाणी सोडण्याच्या चाव्या आहेत. तलावाच्या तळापासून १५ फुट उंचावर पाइप आहे. पंधरा फुटांपेक्षा अधिक पाणी तलावात असेल, तर शहराला पाणीपुरवठा होत होता.

टॅग्स :Waterपाणी