शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

चांदूरच्या १७ बाजार समिती संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:06 PM

येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजनावरांचे अवैध वाहतूक प्रकरण : २१ संचालकांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक बाजार समितीच्या आवारातील अवैध जनावरांचे वाहतूक प्रकरण ११ जून रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती. पहिल्याच दिवशी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिवांवरही कारवाई झाली. बुधवार, २७ जून रोजी संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात आली. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली. त्यानंतर बाजार समितीच्या २१ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली आहे.एसडीपीओ जयंत मिणा यांनी सर्व संचालकांना सकाळी ९ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. मिणा यांनी स्वत: दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून, पुढील कारवाईचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले. ठाणेदारांनी संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२० ब, ४६५, ४६८, ३४ व सहकलम ५ अ, ११ ई व ड अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर दीडच्या सुमारास १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली. चौकशीकरिता बोलावलेल्या इतर संचालकांना अटकेतून सूट देण्यात आली.जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात संचालकांना अटक होण्याची घटना राज्यात एकमेव चांदूर बाजार येथील बाजार समितीत घडली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या संचालकांमध्ये बबलू देशमुख गटाचे सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, अरविंद लंगोटे, मनोज नांगलिया, अमोल लंगोटे, प्रमोद घुलक्षे, नंदकिशोर वासनकर, हरिभाऊ बोंडे, विलास शेकार, सतीश धोंडे तसेच प्रहारचे मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, सुभाष मेश्राम, सत्तारखाँसह तज्ज्ञ संचालक विलास तायवाडे, सतीश मोहड, पणन महासंघाने नियुक्त केलेले संचालक सुरेश विधाते यांचा समावेश आहे.पोलीस ठाण्यापुढे गर्दीसंचालक मंडळाला अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी पोलीस ठाण्यापुढे झाली होती. अटक करूनही त्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत न्यायालयात हजर न केल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आले होते.प्रकरणात केवळ चौकीदार दोषी नसून, संचालक मंडळही दोषी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.- अजय आकरे, ठाणेदार