शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार नोकरीच्या खासगीकरणाचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, आदिवासी संघटना सरसावल्या

By गणेश वासनिक | Updated: April 7, 2023 16:47 IST

बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेणे घटनात्मक तत्वांची पायमल्ली

अमरावती : राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेणारा १४ मार्च २०२३ रोजीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी आदिवासी संघटना सरसावल्या आहेत. शासनाची बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्याची ही कृती घटनात्मक तत्वांची पायमल्ली करणारी असल्याची टीका ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे. हा शासन निर्णय रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, उद्योग ,ऊर्जा व कामगार मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना मागणीचे निवेदन पाठविले आहे. रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियाद्वारे भरताना ती बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेची नियुक्तीस मंजुरी देणारा शासन निर्णय १४ मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सरकारीनोकरीचे खाजगीकरण करणाऱ्या या शासन निर्णयाविरोधात आता ट्रायबल फोरमने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या शासन निर्णयानुसार अतिकुशल मानव संसाधनाची एकूण ७४ पदाची यादी घोषित करण्यात आली असून कुशल पदासाठी ४६, अर्धकुशल पदासाठी ८ तर अकुशल पदासाठी १० संसाधनाची यादी जोडण्यात आली आहे. मात्र भारतीय संविधानाच्या कलम ३०९ नुसार संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून राज्याच्या अखत्यारीतील सेवांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत, असे ट्रायबल फोरमचे म्हणणे आहे. 

राज्य धोरणाच्या निर्देशकास गेला तडा

राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वानुसार स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकाचे पुरेसे साधन मिळवून देण्याचे राज्याचे कर्तव्य ठरते. कलम ३८ नुसार राज्याने लोककल्याण संवर्धनपर समाजव्यवस्था प्रस्थापित करुन दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करावयाची आहे. कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करण्याचे राज्याची जबाबदारी आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीवर अन्याय करणारा निर्णय 

संविधानाच्या कलम १६ (४)च्या नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीयांना यांना शासनाच्या नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहेत. परंतु भारतीय संविधानानुसार राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांना व मूलभूत अधिकारांना डावलण्यासाठी जाणीवपूर्वक शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

मागास घटकांना भरती, पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा डाव

राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय पदे ही भरती व पदोन्नतीद्वारे विशिष्ट प्रक्रियाद्वारे भरली जाते. परंतु केंद्र शासनाच्या 'लँटरल एन्ट्री'प्रमाणे राज्याचे कर्तव्य व अधिकार दुर्लक्षित करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग घटकातील लोकांना भरती व पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यासाठी हा जीआर काढण्यात आल्याचा आरोप ट्रायबल फोरमने केला आहे.

टॅग्स :jobनोकरीAmravatiअमरावतीGovernmentसरकार