शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे कायमच

By admin | Updated: August 11, 2015 00:20 IST

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. ...

लोकमत विशेष

आशेवर विरजण : शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीचांदूरबाजार : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होईल, अशी आशा वर्तविली जात होती. मात्र या सूचनेनंतर १०-१५ दिवसांचा काळ लोटूनही एकही शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी करण्याच्या अनुषंगाने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शासन दरबारी बोललेले प्रत्यक्षात खरे उतरत नाही. एवढीच प्रतिक्रया आता पालकवर्गात व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करीत आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणाऱ्या या निर्णयानंतरही तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे दफ्तर भारीच आहेत. हा निर्णय बस्त्यात गुंडाळून ठेवल्यामुळे विद्यार्थी कंबरेला वाक देत अवजड दफ्तर वाहून नेत असल्याचे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दुकानदारी सुरू आहे. केवळ पैसा कमविण्याच्या उद्देशातून अनेक संसथा शिक्षण क्षेत्रात उतरल्या आहेत. या शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांना ‘मॉडर्न’ बनविण्याकरिता संगणक शिक्षणासह विविध सांस्कृतिक गुण देण्याचाही दावा केला जातो. तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक न करताच विविधांगी शिक्षण देण्यासाठी दफ्तरात अनेक पुस्तके कोंबून केवळ विद्यार्थ्यांच्या पाठीवरील भार वाढविण्याचा चंग या शाळांनी बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिक वजनाचे दफ्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखी, सांधे दुखणे, स्नायू, मणक्यांची झिज, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण वाढणे, डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे शासनाने दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश शाळांना दिले होते. या निर्देशानुसार तालुक्यातील किती शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दफ्तरांचे वजन कमी झाले हा शोधाचा विषय आहे. तालुक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दफ्तर वाहण्याची जीवघेणी कसरत सुरू आहे. दफ्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाहून १० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असा संकेत आहे. अभ्याास मंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त आवश्यकतेपक्षा अधिक शैक्षणिक साहित्य दफ्तरात कोंबले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनापेक्षा दफ्तराचे वजन २० ते ३० टक्क्यांहून अधिक आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक देणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही शाळांनी केल्याचे दिसून येत नाही. अंमलबजावणी होईल तेव्हा खरे!विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत कितीही सूचना दिल्या जात असल्या, योजना आखल्या जात असल्या तरी अद्याप विद्यार्थ्यांना हे ओझे वाहावेच लागत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होईल तेव्हा खरे, असे पालकांना वाटते. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, असे पालकांचे म्हणणे आहे.