शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

१२० दिवसांनंतर बीटीच्या जनुकीय शक्तीत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:54 IST

बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते.

ठळक मुद्दे‘आयएससीआय’ संस्थेची माहिती : बोंडअळीचे जीवनचक्राचा ब्रेक महत्त्वाचा

आॅनलाईन लोकमतअमरावती : बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते. त्यामुळे बीटीअंगी गुलाबी बोंडअळीला प्रतिकार करण्याची कमी होते व पीक किडीला बळी पडते. किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वास्तव ‘आयएससीआय २२व एसएबीसी’ संस्थेच्या अहवालात स्पष्ट आहे.मध्य विभागात कपाशी शेवटच्या तोड्यानंतर थांंबविण्याऐवजी एप्रिल-मेपर्यंत उत्पादनक्षम ठेवले जाते. हे आर्थिक फायद्याचे असले तरी त्यामुळे कपाशीची वर्षानुवर्षे उत्पादनातील शाश्वतताच संपविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळी थंडीच्या कालावधीतील कीड आहे. राज्यात तिचा उद्रेक आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होतो व किडीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान होते, जे टाळता येऊ शकते, जानेवारीनंतर ही कीड पीक नसताना त्यांच्या अवशेषामध्ये कोषावस्थेत असते. मात्र, जानेवारीनंतर पीक उपलब्ध असल्यास ही अळी कोषावस्थेत न जाता नव्याने येणाºया बोंडावर उपजीविका करते. त्यामुळे अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी कपाशीची फरदड न घेणेच फायद्याचे आहे.रेफ्यूजी पिकांची लागवड न करणे हे गुलाबी बोंडअळीत बीटी प्रतिकारकता वाढविण्याचे मुख्य कारण आहे. एक तर शेतकºयांनी लागवडीकडे दुर्लक्ष केले किंवा कमी प्रमाणात लागवड केली. यामुळे अळी कायमच बीटी कपाशीच्या संपर्कात राहून त्यात बीटी प्रतिकारकता विकसित झाली. गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर (मोनोफॉस) गुजराण करणारी आहे, तर उर्वरित प्रकारच्या बोंडअळ्या अनेक पिकांवर किंवा वनस्पतीवर जगत असतात. एकच पीक सतत उपलब्ध असल्यानेही गुलाबी अळीत प्रतिकारक्षमता वेगाने विकसित झाली असल्याचे या पुस्तिकेत स्पष्ट केले आहे.बीटीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब ही महत्त्वाची बाब आहे. उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्यामुळे बोंडअळी उन्हात उघडी पडून मरते. कोष उघडे पडल्यावर पक्षी ते नष्ट करतात.मान्सूनच्या पेरणीनंतर पेरणी, कामगंध सापळ्यांचा वापर कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर हंगाम उशिरापर्यत न लांबविणे पिकांच्या अवशेषाचा उन्हाळ्यातच नायनाट करणे तसेच कापसाची साठवणूक व्यवस्थत केली नाही, तर त्यातुनही तग धरून तिचे जीवनचक्र सुरू राहण्याची भीती आहे.बोंडअळीला उपलब्ध असणारी रेफ्युजी पिकेअमेरिकन बोंडअळी अनेक पिकांवर जगते. तिला चवळी, हरभरा, सूर्यफूल मका , बाजरी, टोमॅटो पर्यायी खाद्य पीक आहे.ठिपक्यांची बोंडअळी काही पिकांवर जगते. यासाठी कपाशी आणि भेंडी पर्यायी पिके आहेत.गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर जगते. तिला पर्यायी खाद्य नाही. मात्र, भेंडी हे यजमान पर्यायी आहे.तंबाखूची पाने खाणारी अळी अनेक पिकांवर गुजराण करते. तिला भाजीपाला, सोयाबीन व एरंडी पर्यायी पीक आहे.