शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

ब्रम्हपुरीची ई-'वन वाघीण' मेळघाटात, आता राज्यातील वाघांची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:11 PM

मेळघाटची दीडशे वाघांची क्षमता

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. आजमित्तीला तेथे 50 ते 52 वाघ आहेत. मेळघाटातील वाघांची संख्या वाढावी यासाठी ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. दोन वर्ष वयाची ही वाघीण जंगल वास्तव्यात सक्षम आहे. तिचे वय बघता ती मेळघाटात अनेक शावकांना जन्मास घालू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून मेळघाटात वाघांची संख्या वाढणार आहे.

चंद्रपूर-ताडोबात वाघांची संख्या वाढत आहे. वाघांची संख्या वाढल्यामुळे ते ब्रम्हपुरीच्या जंगलासह लगतच्या क्षेत्रातील गाव आणि शेत शिवाराकडे फिरकत आहेत. यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी, ज्या व्याघ्र क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे. त्या क्षेत्रात त्यांची संख्या वाढावी म्हणून या वाढत्या, जास्तीच्या वाघांना स्थलांतरित करण्याचे मंथन अभ्यासकांमध्ये सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रथमच ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. ब्रम्हपुरीहून ही वाघीण व्हाया गोरेवाडा-नागपूरमार्गे मेळघाटात पोहचली. मेळघाटात दाखल होण्यापूर्वी ती गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मुक्कामाला होती. 

देहरादुनहून नजरकॉलर आयडीसह मेळघाटात दाखल या ई-वन वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर, वन्यजीव संस्था देहरादून येथील डॉ. बीलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात विशेष लक्ष दिले जाणार आहे. याकरिता देहरादूनहून खास तज्ज्ञ मेळघाटात नियुक्त केले जातील. हे तज्ज्ञ सॅटेलाईटच्या मदतीने त्या कॉलर आयडीवरून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणार आहेत. नोंदी घेणार आहेत. यात गुगामल वन्यजीव विभागाचीही जबाबदारी वाढली आहे. कॉलर आयडी असलेली आणि आपले लोकेशन देणारी ही मेळघाटातील पहिली वाघीण ठरली आहे.

राज्यातील वाघांची संख्याराज्यात वाघांची वस्तीस्थाने वाढली आहेत. यात वाघांची संख्याही वाढली आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये ती 169 वर पोहचली. 2014 मध्ये राज्यात 190 वाघ नोंदल्या गेले. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर व्हायची असली तरी 2014 नंतर राज्यात वाघांच्या संख्येची स्थिती सुधारली आहे. सन 2014 च्या आकडेवारीत ताडोबातील सर्वाधिक म्हणजे 100 ते 110 वाघ, मेळघाटातील 45 ते 50 वाघ आणि पेंचमधील 25 ते 30 वाघांचा समावेश आहे.

देशातील वाघांची संख्यादेशात 2006 मध्ये 1 हजार 411 वाघ नोंदल्या गेलेत. 2010 मध्ये 1 हजार 706 तर 2014 मध्ये 2 हजार 226 वाघ आढळून आले आहेत. देशपातळीवरही वाघांची संख्या वाढत आहे. वाघ ही भारताची ओळख असून जगातील 3 हजार 890 वाघांपैकी 57 टक्के वाघ भारतात आहेत.मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघ सांभाळण्याची क्षमता आहे. मावन व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता, जेथे वाघांची संख्या कमी आहे तेथे वाघांची संख्या वाढविण्याकरिता, ज्या भागात वाघ अधिक आहे, तेथील वाघांचे स्थलांतर करण गरजेचे आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती 

टॅग्स :Tigerवाघchandrapur-pcचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प