भाजपाने के ली ऐतिहासिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:27 IST2017-08-13T23:26:35+5:302017-08-13T23:27:06+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला.

भाजपाने के ली ऐतिहासिक फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला. यात कर्जमाफी नव्हे, तर शासनाने केलेली फसवणूक ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजपा-शिवसेना युती सरकारवर ताशेरे ओढले.
आपण सरकारला जाब विचारण्यासाठीच येथे आलो असून पुढील आंदोलन कापूस व सोयाबीनसाठी करणार असल्याचे सूतोचाव त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे आयोजित सुकाणू समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 'शेतकरी एल्गार' मेळाव्यात ते शेतकºयांसमोर भावना व्यक्त करीत होते.
यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, अचलपूर मतदारसंघाचे आ.बच्चू कडू, प्रकाश पोकळे, गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, वंदना यादव, दया राऊत, देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा.शेट्टी म्हणाले, मला मंत्रिपदाची आॅफर देण्यात आली. मात्र, आधी शेतकºयांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोग लागू करा, या मागण्या मी समोर ठेवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उत्पादनावर दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. ज्या हातांनी सरकारला दिल्लीच्या चाव्या दिल्या तेच हात त्यांना हाकलून लावतील. शासनाने दिवाळीपर्यंत कर्जमाफीचा घोळ सोडवावा, अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकºयांना अटी का?
देश सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. हे युद्ध भारत-चीन यांच्यात असल्याचा बनाव केला जातो. मात्र प्रत्यक्षात हे युद्ध भारतविरुद्ध इंडिया यांच्यात सुरू आहे. शेतकºयांना अटी लावून कर्ज माफ केले जाते. उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी कोणतीही अट लावली जात नाही. शेतकºयांचे गंभीर प्रश्न सोडून सरकार के वळ जातीयवाद पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला.