शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देपोर्टेबिलिटीद्वारा पुरवठा : धान्य देण्याच्या दुकानदारांना सूचना, दरमहा २० हजारांवर लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात 'वन नेशन वन रेशन'ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे. सदरची योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दरमहा २० हजारांवर लाभार्थ्यांना या प्रणालीव्दारे लाभ दिला जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांिगतले.असे आहे कार्डनिहाय वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो मोफत तूर किंवा चना डाळ देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात एप्रिल मे व जून या तीन महिन्यासाठी प्रतिमहिना १७८ मेट्रिकटन तूरडाळ व २६७ टन चणाडाळ उपलब्ध झाली आहे. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रतिकार्ड १५ किलो गहू, ३ रुपये किलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्डावर २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदळाचे वितरित केले जात आहे.'वन नेशन वन रेशन' योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य दिले जाणार आहेत. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. सदर योजनेच्या लाभ घेण्याकरिता स्थानिकांना प्राधान्य राहणार आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या