शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2023 17:06 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा थाटात

अमरावती : केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नीतीमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी दिला.

संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ. एच. एम. धुर्वे, डॉ. व्ही. एच. नागरे, सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. नलिनी टेंभेकर, सहसंचालक तंत्रशिक्षण डॉ. व्ही. आर. मानकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक मोनाली तोटे पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. डुडुल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. डी. डब्ल्यू. निचित, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यपाल बैस म्हणाले, अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव हे महत्त्वाचे ठरले आहे. गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक असून त्यांची दशसूत्री समाजाला मार्गदर्शक ठरली. त्यामुळे आता गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन समाजात परिवर्तन करावे. शेतकऱ्यांसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्याधन हे कुणीही हिरावू शकत नाही. त्यामुळे शिका, मोठे व्हा आणि समाजाचं ऋण फेडा, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला. यापुढे कोणतेही महाविद्यालय ‘नॅक’ मूल्यांकन शिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे ‘नॅक’ करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाचे सात गुणवंत ठरले मानकरी अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियंका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (वरूड) यांना राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या हस्ते पदकांनी गौरविण्यात आले.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसuniversityविद्यापीठAmravatiअमरावतीEducationशिक्षण