शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 6:18 PM

अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.

- इंदल चव्हाणअमरावती - येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.अमरावती येथील वडाळी तलावानजीक वनविभागांतर्गत बांबू गार्डन नावारूपास आले आहे. तेथे विविध प्रजातीचे बांबू विकसित करण्यात आले आहेत. येथे वनपाल सैयद सलीम यांनी केरळ राज्यातील २२ प्रजातीच्या बांबूंची रोपे आणण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. यामध्ये बांबूसा डिस्सिम्यूलेटर, बांबूसा टेक्सटिलिस, सेफालोस्टाचाइम फुचसिएनम, सेफालोस्टाचाइम युनानिकस, डायनोचलोआ सॅचेलांदी, गिगांटोचलोआ मांगोने, गिगांटचलोआ व्हर्टिसिल्लाटा, मेलोकातमस कॉम्पॅक्टीफ्लोरस, आॅचलांद्रा तालबोती, आॅचलांद्रा विट्टी, आॅचलांद्रा सेटिगेरा, आॅचलांद्रा ट्राव्हंसोरिया हिरसुता, फिलॉस्ताचिस सल्फ्युरिया, सेउडॉक्सीटेनांथेरा बौर्डीलोलणी, ससा फॉर्क्यी व्हेरिएगेटेड, बांबूसा ब्रोमिश, डेंड्रोकालमस एण्डोमनिका, फिलॉस्टॅचीस व्हेरिगेटेड, व्हेरिगेटेड कलरचेंज या प्रजातीचे बांबूंची मातीविरहित रोपे जवळपास १ क्विंटल वजनाची विमानाने आणावी लागली. ती जिवंत राहावी, यासाठी कमी वेळेत आणणे गरजेचे असल्याने विमानाचा पर्याय निवडल्याचे वनपाल सैय्यद सलीम अहमद यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

आर्द्रतेसाठी उपयुक्तबांबू ही गवताची जात आहे. बांबूची पाने लांब आणि निमुळत्या आकाराची असतात. पाने गळाल्यानंतर जमिनीवर आछादतात. पावसाचे पाणी थेट जमिनीत न शिरता पाना-पानांतून जमिनीत मुरते. जमिनीत ओल असताना वरून पाने असल्याने  उन्हाचा थेट जमिनीवर प्रवेश होत नसल्याने त्या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. त्याचा इतर पिकांनाही फायदा होतो. त्यामुळे शेतकºयांनी नापिकीच्या भागात बांबूची लागवड केल्यास त्याचा लाभ निश्चित होऊ शकेल.

खारपाणपट्ट्यात बांबूची लागवड फायद्याचीमध्यभारतातच खारपाणपट्ट्याची जमीन असून, क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते पिकांसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अशा जमिनीत भरघोस उत्पन्न मिळू शकत नाही. यावर उपाययोजना म्हणून अशा भागात बांबूची शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच शेताला कुंपण घालण्यासही बांबू उपयुक्त ठरू शकते. बांधावर काटेरी बांबूची लागवड केल्यास कुंपणाचा खर्चही वाचेल आणि बांधापासूनदेखील शेतकºयांना उत्पन्न मिळेल. ही प्रणाली काही शेतकºयांच्या लक्षात आल्याने आता याकडे शेतकºयांचा कल वाढीस लागला आहे.

परराज्यातून आणलेला बांबू येथील वातावरणाशी समरस बनविणे, त्याला महाराष्ट्रीय प्रजातीत रुपांतरण करून तो शेतकºयांना लागवडीसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा शेतकºयांना लाभ निश्चित होईल.- सैय्यद सलीम अहमद, वनपाल, वडाळी मध्यवती रोपवाटिका.

टॅग्स :Amravatiअमरावती