शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वादळासह अवकाळी : १ ठार, तीन गंभीर; २९ जनावरे मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 19:25 IST

७० हजार हेक्टरला फटका : तीन हजार घरांची पडझड, बाधित क्षेत्र वाढणार

अमरावती : पश्चिम विदर्भात चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात एक व्यक्ती मृत, तीन जखमी, तीन हजार घरांची पडझड व ७० हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या बाधित पिकांच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. आपत्तीग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

गुरुवारी रात्री अमरावती व्यतिरिक्त अन्य चार जिल्ह्यात पुन्हा काही गावांना वादळाचा फटका बसल्याने बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. विभागात ८ ते १० एप्रिल या तीन दिवसांमध्ये वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ३५ तालुक्यांमधील १२६१ गावांना फटका बसला आहे. यामध्ये ६९,३५३ हेक्टरमधील गहू, हरभरा, उन्हाळी मूग, ज्वारी, केळी, लिंबू, संत्रा, पपई, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. या जिल्ह्यात १५६६ घरांची पडझड झालेली आहे, शिवाय १३ पशुधनाचा मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यात ५५ घरांची पडझड, तर यवतमाळ जिल्ह्यात ५८१ घरांची पडझड झाली. आर्णी तालुक्यात एका महिलेचा मृत्यू व तीन जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३०९ घरांची पडझड व १३ गुरांचा मृत्यू झाला. याशिवाय वाशिम जिल्ह्यात ३५६८ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

टॅग्स :Rainपाऊस