शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वादळासह अवकाळी : १ ठार, तीन गंभीर; २९ जनावरे मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 19:25 IST

७० हजार हेक्टरला फटका : तीन हजार घरांची पडझड, बाधित क्षेत्र वाढणार

अमरावती : पश्चिम विदर्भात चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात एक व्यक्ती मृत, तीन जखमी, तीन हजार घरांची पडझड व ७० हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या बाधित पिकांच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. आपत्तीग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

गुरुवारी रात्री अमरावती व्यतिरिक्त अन्य चार जिल्ह्यात पुन्हा काही गावांना वादळाचा फटका बसल्याने बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. विभागात ८ ते १० एप्रिल या तीन दिवसांमध्ये वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ३५ तालुक्यांमधील १२६१ गावांना फटका बसला आहे. यामध्ये ६९,३५३ हेक्टरमधील गहू, हरभरा, उन्हाळी मूग, ज्वारी, केळी, लिंबू, संत्रा, पपई, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. या जिल्ह्यात १५६६ घरांची पडझड झालेली आहे, शिवाय १३ पशुधनाचा मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यात ५५ घरांची पडझड, तर यवतमाळ जिल्ह्यात ५८१ घरांची पडझड झाली. आर्णी तालुक्यात एका महिलेचा मृत्यू व तीन जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३०९ घरांची पडझड व १३ गुरांचा मृत्यू झाला. याशिवाय वाशिम जिल्ह्यात ३५६८ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

टॅग्स :Rainपाऊस