लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/चांदूर बाजार (अमरावती) : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्यांचीच ओळख मिटविण्याचे मोठे षडयंत्र सरकारकडून रचण्यात येत आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी त्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू आहे.
शेतकरी असंघटित असल्याचा फायदा सरकार घेत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी संकटांना बळी पडून किंवा जीवनात हार मानून मरण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लढाईत जिवाची बाजी लावून संघर्ष करावा. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. उपोषणस्थळी त्यांच्यासह एकूण ५० जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गुरुवारी चक्काजामशासनाने ११ जूनपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही, तर नागपूर-अमरावती महामार्गावर शेळ्या-मेंढ्या उभ्या करून चक्काजाम करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे.