शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मेळघाटातील एकाधिकारच्या १२ केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही. सर्व बारा केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे गावखेड्यात व्यापारी दर पाडून आदिवासींकडून शेतमाल खरेदी करून घेत आहेत.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळाची खरेदी बंदच : खेडा खरेदीत व्यापाऱ्यांकडून भाव पाडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही. सर्व बारा केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे गावखेड्यात व्यापारी दर पाडून आदिवासींकडून शेतमाल खरेदी करून घेत आहेत.धारणी, चिखलदरा तालुक्यात एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींच्या सोयाबीन, गहू, चणा, तूर आदी शेतमालाची खरेदी करण्यात येते. त्यांची गैरआदिवासींकडून लूट होऊ नये, यासाठी बाजारभावानुसार ही खरेदी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदिवासी विकास महामंडळाला खरेदीचे दर पाठवले जातात. त्यानुसार चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, हतरू, चुरणी, टेम्ब्रुसोंडा, अंबापाटी, चिखली तसेच धारणी तालुक्यातील बैरागड, चाकर्दा, हरिसाल, साद्राबाडी, कळमखार आणि धारणी अशा एकूण बारा केंद्रांवर ही खरेदी केली जाते. यंदा एकही केंद्र सुरू न झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी दरात धान्य खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने आदिवासींना रोजगाराअभावी आर्थिक चणचण जाणवू लागली. त्याचवेळी त्यांची लूट होत आहे.लॉकडाऊनमुळे खरेदी केंद्रे उघडण्यात आली नाहीत. ते संपल्यानंतर खरेदी केंद्रेसुद्धा सुरू करण्यात येणार आहेत.-गजानन कोटलावार,प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, धारणीकोरोनाचा धसका!सर्व देश २३ मार्चनंतर लॉकडाऊन झाला. मात्र, आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ऑक्टोबर महिन्यापासून बंदच आहे. सोयाबीननंतर आदिवासींचा गहू, चणा, तूर घरात पडून आहे. आता आदिवासी विकास महामंडळाने लॉकडाऊनची भीती पुढे केली आहे. प्रत्यक्षात कोरोनाची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून खरेदी व्यवहार सुरू करण्याची मागणी होत आहे.सोयाबीन गेले व्यापाऱ्यांच्या घशातआदिवासी विकास महामंडळांतर्गत मेळघाटातील या बाराही खरेदी केंद्रांमधून ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत आदिवासी शेतकºयांनी पिकवलेल्या धान्याची खरेदी केली जाते. मात्र, सात महिन्यांपासून खरेदी केंदे्र उघडण्यात न आल्याने संपूर्ण सोयाबीन खासगी व्यापाºयांच्या घशात गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या