शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेने पीक विमा बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:08 IST

लोकमत आॅनलाईनअमरावती : यंदाचा खरीप हंगामातील सोयाबीन अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले. यामधून बचावलेल्या सोयाबीनची परतीच्या पावसामुळे प्रतवारी खराब झाली. उत्पादनखर्चही निघाला नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाद्वारा हेक्टरी ८.५ क्विंटल उत्पादकता काढल्याची माहिती आहे. हा अहवाल आयुक्तालय स्तरावर जाहीर होणार असला तरी या उत्पादकतेमुळे खरीप पीक विमा बाधित होण्याची शक्यता आहे.यंदाच्या हंगामात ...

ठळक मुद्देउत्पादनखर्चही निघाला नाही : १६८ गावांतील पीक कापणी प्रयोगानंतरचे चित्र

लोकमत आॅनलाईनअमरावती : यंदाचा खरीप हंगामातील सोयाबीन अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले. यामधून बचावलेल्या सोयाबीनची परतीच्या पावसामुळे प्रतवारी खराब झाली. उत्पादनखर्चही निघाला नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाद्वारा हेक्टरी ८.५ क्विंटल उत्पादकता काढल्याची माहिती आहे. हा अहवाल आयुक्तालय स्तरावर जाहीर होणार असला तरी या उत्पादकतेमुळे खरीप पीक विमा बाधित होण्याची शक्यता आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरी ३ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ८६ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रात सोयबीनची पेरणी झाली. मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटून कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामधून जे सोयाबीन बचावले, ते परतीच्या पावसामुळे बाधित होऊन प्रतवारी खराब झाली. याचा कृषी विभागाद्वारा काढण्यात येणाऱ्या सरासरी पीक उत्पादकतेवर परिणाम झालेला नाही, असे पीक कापणी प्रयोगाअंती काढण्यात आलेल्या निष्कर्षात स्पष्ट झाले.कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण गावांच्या २० टक्के म्हणजेच १६८ गावांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग काढण्यात आले. सबंधित ग्रामसेवक, कृषिसेवक व मंडळ अधिकारी यांनी संबंधित क्षेत्रात प्लॉट टाकून सवंगणी व मळणीच्या काळात निरीक्षण केले. या ३३६ पीक कापणी प्रयोगाअंती जिल्ह्यातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी साधारणपणे ८.५ क्विंटल आहे व हा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासनस्तरावरून अहवाल विमा कंपनीस पाठविला जाईल. त्यामुळे सोयाबीनच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनी कोणते निकष लावते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, या सर्व शासन निकषात शेतकरी भरडला जात असल्याचे वास्तव आहे.पाच वर्षात रँडम पद्धतीने गावाची निवडपीक कापणी प्रयोगासाठी जिल्ह्यातील एकून गावापैकी २० टक्के गावांची रँडम पद्धतीने कृषी विभागाद्वारा निवड करण्यात येते. म्हणजेच पाच वर्षात जिल्ह्यातील सर्वच गावांचा यामध्ये समावेश होतो. निवड झालेल्या गावातील संबंधित शेतामध्ये १० बाय १० मीटरचे प्लॉट टाकण्यात येऊन पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून तीन विभागाद्वारे सरासरी उत्पादकता काढण्यात येते व अहवाल कृषी आयुक्तालयास पाठवून तेथे जिल्हा, विभाग व राज्याची सरासरी उत्पादकता काढण्यात येते व विमा कंपनीसदेखील याची माहिती दिली जाते.अवकाळीने प्रतवारी खराब, दरात फटकायंदाच्या हंगामात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या तसेच सवंगणी व मळणीच्या काळात अवकाळी पावसाने सोयाबीन डागी झाले. प्रतवारी खराब झाल्याने सोयाबीन ‘नाफेड’ केंद्रांवर नाकारले जात आहे, तर व्यापारी हमीभावापेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने माल खरेदी करीत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पीक कापणी प्रयोगामध्ये फक्त उत्पादकता पाहिली जात असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.