शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत ...

ठळक मुद्देबच्चूकडू : तिवस्यात जाहीर सभा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत चौकात आ. बच्चू कडू यांची जाहीर सभा बुधवारी सकाळी पार पडली. जाहीर सभेच्या व्यासपीठावर प्रहार जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मनोज अंबलकर, गझलकार नितीन देशमुख, प्रमोद कुदळे, अतुल खुपते, गजू कुबडे, प्रवीण हेंडवे, मंगेश देशमुख, बल्लू जवंजाळ, तिवसा तालुकाप्रमुख गजू कडू, संघटक राज माहोरे यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील प्रमुख उपस्थित होते. आसूड यात्रेला व सभेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेकडो वाहनांतून हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.आसूड सभेची भूमिका मांडताना आ.बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. अलीकडच्या १२ वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याच सुमारास २००६ मध्ये स्वामिनाथन आयोग स्थापन झाला. मात्र, अजूनही त्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत. आता सत्ता नसताना तेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हल्लाबोल करतात. म्हणजेच काँग्रेस असो की भाजपचे सरकार, शेतकऱ्यांचे कुठलेही घेणे-देणे या सत्ताधाऱ्यांना नाही. भाजप सरकारने अपघात विमा व पीकविम्यातून कंपन्यांचे खिसे भरले. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम ठेवण्याचे काम आता 'प्रहार' करणार आहे. शेतकऱ्यांप्रति तळमळ ठेवून या आसूड यात्रेतून शेतकरी, जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही पार पाडू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे सभास्थळ खचाखच भरले होते.चांदूर रेल्वेमार्गे 'आसूड' यात्रायवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथून आसूड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंगळवारी रात्री ११ वाजता चांदूर रेल्वे मार्गाने ही आसूड यात्रा तिवसा तालुक्यात दाखल झाली. कुऱ्हा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत मुक्काम ठोकला. सकाळी आ. बच्चू कडू यांनी महासमाधीचे दर्शन घेतले. ही यात्रा अमरावती-नागपूर महामार्गाने बुधवारी सकाळी ११ वाजता तिवसा नगरपंचायतजवळ पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली.पोटाचा प्रश्न मिटलेला नाही; शौचालयाची सक्तीशेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण, आज ऊसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात असल्याची टीका आ.कडू यांनी केली.