शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या आश्रमशाळेची राष्ट्रपतींकडे तक्रार; मान्यता रद्द करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 11:37 IST

बोराळा येथील शाळेवर मेहरबान का? जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद

परतवाडा (अमरावती) : चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा येथील पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी विमुक्त जाती, भटक्या जमाती प्राथमिक मराठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना १७ आसनी वाहनात ५७ विद्यार्थी कोंबून नेल्याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने कुठलीच कारवाई अजून न केल्याने आदिवासींनी संताप व्यक्त केला आहे.

दिवाळी सुटीदरम्यान चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांना १७ आसनी वाहनात कोंबून नेण्यात आले. परतवाड्यात हा प्रकार किशोर वाघमारे व सागर व्यास या सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला. पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी कारवाईसाठी न्यायालयात प्रकरण पाठवले. दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव झाला; परंतु आदिवासी विद्यार्थ्यांशी जीवघेणा खेळ करणाऱ्या आश्रमशाळेवर कुठलीच कारवाई झाली नाही. यासंदर्भात शाळा प्रशासनावर कारवाईसह मान्यता रद्द करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

पटसंख्या, सुविधांची चौकशी करा

चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा येथे येथे चंद्रपुरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळामार्फत पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी विमुक्त जाती, भटक्या जमाती प्राथमिक मराठी आश्रमशाळेला शासनामार्फत शंभर टक्के अनुदान प्रदान केले आहे. आश्रमशाळेत मेळघाटातील आदिवासी मुलांची संस्थेचे लोक स्वत: जाऊन प्रवेश करतात. मात्र, उपस्थिती नाममात्र असते. शाळेमध्ये व वसतिगृहात शासन निर्णयानुसार कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. त्याचीही चौकशी करण्याची मागणी पत्रात केली आहे.

जिल्हा प्रशासन, संबंधित विभाग निष्क्रिय

संस्थाचालकांनी १९ ऑक्टोबर रोजी शिक्षकांसोबत मेळघाट येथील अतिदुर्गम गावातील १७ सीटर वाहनात ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून नेले जात असल्याचे सामाजिक संघटना व प्रसार माध्यमांनी उघडकीस आणले. तरीसुद्धा आजपर्यंत आश्रमशाळा व संस्थाचालकावर कारवाई झालेली नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावती