शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:21 IST

परदेशातील निर्यात बंद : दर स्थिरावले, साठवणुकीकडे कल

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रुई आणि सरकीच्या भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माधारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.

जिल्ह्यात कॅश क्रॉप म्हणून कापसाची ओळख आहे. किंबहुना खरीप हंगामात कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. किंबहुना देशभरात हीच स्थिती असल्याने कापसाचे सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यातच कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची दरवर्षी होत असलेली दरवाढ सोबतच कापूस वेचणीचा दर १० रुपये किलोवर गेल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत मार्केटमध्ये भाव नाही. कापसाला सध्या उठावच नसल्याने खुल्या बाजारात आवक थंडावली आहे. थोडीफार आवक सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे. तिथेही आठ टक्के आर्द्रतेच्या निकषात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी मिळत आहेत. परंतु खासगी खरेदीपेक्षा किमान क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये जास्त मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत किंवा खेडा खरेदीत देत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे. उर्वरित शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करीत असल्याने सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.

गारमेंट हब बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली बांगलादेशात गारमेंटचा मोठा उद्योग असल्याने भारताकडून कापूस आयात केला जातो. सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतातून होणारी निर्यात थांबली आहे. याचा फार मोठा फटका कापूस उद्योगाला बसला आहे. बांगलादेशात किमान १५ ते १६ लाख व चीनमध्ये १० ते १२ लाख गाठींची निर्यात व्हायची, यंदा निर्यात बंद असल्याने कापसाला उठाव नसल्याचे वास्तव आहे.

७० सेंट पर पाउंडवर स्थिरावला रुईचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा ७० सेंट पर पाउंड (४५० ग्रॅम) असा भाव आहे. देशांतर्गत गाठीचा ५२ ते ५३ हजारांपर्यंत (१७५ किलो) भाव मिळत आहे. शिवाय सरकीलादेखील देशांतर्गत ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल भाव आहे. या दरावरच सध्या बाजारभाव स्थिरावला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

"आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परदेशात जाणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे खासगी खरेदीत कापसाची आवक थंडावली आहे. थोडीफार खरेदी सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे."- पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.

टॅग्स :Amravatiअमरावती