शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:21 IST

परदेशातील निर्यात बंद : दर स्थिरावले, साठवणुकीकडे कल

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रुई आणि सरकीच्या भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माधारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.

जिल्ह्यात कॅश क्रॉप म्हणून कापसाची ओळख आहे. किंबहुना खरीप हंगामात कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. किंबहुना देशभरात हीच स्थिती असल्याने कापसाचे सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यातच कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची दरवर्षी होत असलेली दरवाढ सोबतच कापूस वेचणीचा दर १० रुपये किलोवर गेल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत मार्केटमध्ये भाव नाही. कापसाला सध्या उठावच नसल्याने खुल्या बाजारात आवक थंडावली आहे. थोडीफार आवक सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे. तिथेही आठ टक्के आर्द्रतेच्या निकषात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी मिळत आहेत. परंतु खासगी खरेदीपेक्षा किमान क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये जास्त मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत किंवा खेडा खरेदीत देत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे. उर्वरित शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करीत असल्याने सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.

गारमेंट हब बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली बांगलादेशात गारमेंटचा मोठा उद्योग असल्याने भारताकडून कापूस आयात केला जातो. सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतातून होणारी निर्यात थांबली आहे. याचा फार मोठा फटका कापूस उद्योगाला बसला आहे. बांगलादेशात किमान १५ ते १६ लाख व चीनमध्ये १० ते १२ लाख गाठींची निर्यात व्हायची, यंदा निर्यात बंद असल्याने कापसाला उठाव नसल्याचे वास्तव आहे.

७० सेंट पर पाउंडवर स्थिरावला रुईचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा ७० सेंट पर पाउंड (४५० ग्रॅम) असा भाव आहे. देशांतर्गत गाठीचा ५२ ते ५३ हजारांपर्यंत (१७५ किलो) भाव मिळत आहे. शिवाय सरकीलादेखील देशांतर्गत ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल भाव आहे. या दरावरच सध्या बाजारभाव स्थिरावला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

"आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परदेशात जाणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे खासगी खरेदीत कापसाची आवक थंडावली आहे. थोडीफार खरेदी सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे."- पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.

टॅग्स :Amravatiअमरावती