शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

Farmers Suicide : नऊ महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 17:57 IST

Farmers Suicide : पश्चिम विदर्भात ८१७, मराठवाड्यात ६६१ शेतकरी आत्महत्यांची नोंद

गजानन मोहोड

अमरावती : सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा करीत असले तरी यावर्षीच्या नऊ महिन्यांत अस्मानी आणि सुलतानी संकटांनी धीर खचलेल्या १,४७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे. यामध्ये पश्चिम विदर्भात ८१७, तर मराठवाड्यात ६६१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला. राज्यात दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याने चिंता वाढली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात सन २०२१ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत १८,४८२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ८,५२३ प्रकरणात शासन मदत देण्यात आली. त्यापेक्षा जास्त ९,७८१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. अद्याप ३७९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय शेतकरी का घेतात, याचे कारण जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी शेतकरी कुटुंबात एक दिवस मुक्काम केला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील ‘बळीराजासोबत एक दिवस’ घालविला. १०० दिवसांत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी अमरावती दौऱ्यात सांगितले होते. राज्यातील नऊ हजार गावांमध्ये कृषी व महसूल विभागाचे अधिकारी या अभियानात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची पाठ फिरताच अभियान गुंडाळले गेल्याने या संवेदनशील विषयावर प्रशासन कितपत गंभीर आहे ही बाब अधोरेखित झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हानिहाय स्थिती

१) पश्चिम विदर्भात यंदा नऊ महिन्यांत ८१७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २३२, अकोला १०१, यवतमाळ २१८, बुलडाणा १८५ व वाशिम जिल्ह्यात ८१ आत्महत्या झाल्या आहेत.

२) मराठवाड्यात यंदा ६६१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यात १७८, औरंगाबाद ११०, जालना ९२, परभणी ५२, हिंगोली २४, नांदेड ९३, लातूर ३६ व उस्मानाबाद जिल्ह्यात ६० आत्महत्या झाल्या आहेत.

मदतीच्या निकषात १६ वर्षांनंतरही बदल नाही

शेतकरी आत्महत्येप्रकरणी मृताच्या वारसास २००६ मधील शासनादेशाच्या आधारे ३० हजारांचा धनादेश व ७० हजार रुपये मासिक बचत योजनेत मुदत ठेव ठेवली जाते. १६ वर्षांत शासनाने मदतीच्या निकषात शासनाने बदल केलेला नाही. याशिवाय विविध कारणांनी अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूagricultureशेती