शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Suicide : नऊ महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 17:57 IST

Farmers Suicide : पश्चिम विदर्भात ८१७, मराठवाड्यात ६६१ शेतकरी आत्महत्यांची नोंद

गजानन मोहोड

अमरावती : सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा करीत असले तरी यावर्षीच्या नऊ महिन्यांत अस्मानी आणि सुलतानी संकटांनी धीर खचलेल्या १,४७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे. यामध्ये पश्चिम विदर्भात ८१७, तर मराठवाड्यात ६६१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला. राज्यात दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याने चिंता वाढली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात सन २०२१ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत १८,४८२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ८,५२३ प्रकरणात शासन मदत देण्यात आली. त्यापेक्षा जास्त ९,७८१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. अद्याप ३७९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय शेतकरी का घेतात, याचे कारण जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी शेतकरी कुटुंबात एक दिवस मुक्काम केला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील ‘बळीराजासोबत एक दिवस’ घालविला. १०० दिवसांत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी अमरावती दौऱ्यात सांगितले होते. राज्यातील नऊ हजार गावांमध्ये कृषी व महसूल विभागाचे अधिकारी या अभियानात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची पाठ फिरताच अभियान गुंडाळले गेल्याने या संवेदनशील विषयावर प्रशासन कितपत गंभीर आहे ही बाब अधोरेखित झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हानिहाय स्थिती

१) पश्चिम विदर्भात यंदा नऊ महिन्यांत ८१७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २३२, अकोला १०१, यवतमाळ २१८, बुलडाणा १८५ व वाशिम जिल्ह्यात ८१ आत्महत्या झाल्या आहेत.

२) मराठवाड्यात यंदा ६६१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यात १७८, औरंगाबाद ११०, जालना ९२, परभणी ५२, हिंगोली २४, नांदेड ९३, लातूर ३६ व उस्मानाबाद जिल्ह्यात ६० आत्महत्या झाल्या आहेत.

मदतीच्या निकषात १६ वर्षांनंतरही बदल नाही

शेतकरी आत्महत्येप्रकरणी मृताच्या वारसास २००६ मधील शासनादेशाच्या आधारे ३० हजारांचा धनादेश व ७० हजार रुपये मासिक बचत योजनेत मुदत ठेव ठेवली जाते. १६ वर्षांत शासनाने मदतीच्या निकषात शासनाने बदल केलेला नाही. याशिवाय विविध कारणांनी अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूagricultureशेती