शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:16 IST

Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा सन्मानित; ७५ लाखांचे रोख पारितोषिक

लोकमत न्यूज नेटवर्कदिल्ली/अमरावती : स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती शहराने देशभरातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. हा पुरस्कार मंगळवारी (दि.९) नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमरावती महापालिकेच्यावतीने आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी हा सन्मान स्वीकारला.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ ते १० लाख लोकसंख्या) या गटात स्पर्धेत परिपूर्ण २०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. अमरावतीला ७५ लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

या यशामुळे अमरावतीने अन्य शहरांसाठी एक आदर्श उभारला असून, स्वच्छ वायू आणि हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचे नाव आता अग्रगण्य राहील यात शंका नाही. 

मध्य प्रदेशातील इंदूर व देवास अव्वल

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) वायूप्रदूषण कमी करून शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर, देवास व महाराष्ट्रातील अमरावती या शहरांनी अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारी येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली. औद्यागिक केंद्रे किंवा कोळसा खाणी असतानादेखील वायूप्रदूषण कमी करण्यात या शहरांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे यादव यांनी नमूद केले.

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर प्रथम तर जबलपूर दुसन्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशातील आक्षा व गुजरातमधील सुरत यांचा संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक लागतो. ३ ते १० लाख लोकसंख्या गटातील शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील अमरावती शहर अव्वल ठरले आहे. उत्तर प्रदेशातील झांसी व मुरादाबाद शहरांचा संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक लागतो तर राजस्थानातील अवलर शहर तिसन्या स्थानी आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये मध्यप्रदेशचे देवास प्रथम क्रमांकावर आहे. यात हिमाचल प्रदेशातील परवाणू दसन्या तर ओडिशातील अंगल शहराचा राज्ज हवेच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक लागतो.

"स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिका पटकावणे ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हे पारितोषिक अधिक प्रेरणा देणारे असून, भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबविण्याचा संकल्प आहे. अमरावतीला देशातील एक हरित आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."- सौम्या शर्मा (चांडक), आयुक्त

टॅग्स :Amravatiअमरावतीpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण