शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:16 IST

Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा सन्मानित; ७५ लाखांचे रोख पारितोषिक

लोकमत न्यूज नेटवर्कदिल्ली/अमरावती : स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती शहराने देशभरातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. हा पुरस्कार मंगळवारी (दि.९) नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमरावती महापालिकेच्यावतीने आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी हा सन्मान स्वीकारला.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ ते १० लाख लोकसंख्या) या गटात स्पर्धेत परिपूर्ण २०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. अमरावतीला ७५ लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

या यशामुळे अमरावतीने अन्य शहरांसाठी एक आदर्श उभारला असून, स्वच्छ वायू आणि हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचे नाव आता अग्रगण्य राहील यात शंका नाही. 

मध्य प्रदेशातील इंदूर व देवास अव्वल

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) वायूप्रदूषण कमी करून शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर, देवास व महाराष्ट्रातील अमरावती या शहरांनी अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारी येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली. औद्यागिक केंद्रे किंवा कोळसा खाणी असतानादेखील वायूप्रदूषण कमी करण्यात या शहरांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे यादव यांनी नमूद केले.

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर प्रथम तर जबलपूर दुसन्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशातील आक्षा व गुजरातमधील सुरत यांचा संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक लागतो. ३ ते १० लाख लोकसंख्या गटातील शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील अमरावती शहर अव्वल ठरले आहे. उत्तर प्रदेशातील झांसी व मुरादाबाद शहरांचा संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक लागतो तर राजस्थानातील अवलर शहर तिसन्या स्थानी आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये मध्यप्रदेशचे देवास प्रथम क्रमांकावर आहे. यात हिमाचल प्रदेशातील परवाणू दसन्या तर ओडिशातील अंगल शहराचा राज्ज हवेच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक लागतो.

"स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिका पटकावणे ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हे पारितोषिक अधिक प्रेरणा देणारे असून, भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबविण्याचा संकल्प आहे. अमरावतीला देशातील एक हरित आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."- सौम्या शर्मा (चांडक), आयुक्त

टॅग्स :Amravatiअमरावतीpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण