शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘लॉकडाऊन’च्या मार्गावर अमरावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 6:00 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मॉल, आठवडी बाजार, गुरांच्या बाजारात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाच दिवस जिल्हा ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : २१ ते २५ मार्चदरम्यान व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी दैनंदिन वापरातील अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता २१ ते २५ मार्च दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मॉल, आठवडी बाजार, गुरांच्या बाजारात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाच दिवस जिल्हा ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे. २१ ते २५ मार्च या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सोने-चांदीची दुकाने, कापड, ऑटोमोबाइल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड आदी दुकानांमध्ये नागरिकांच्या होणाºया गर्दीमुळे कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सदर उपाययोजना करण्यात आली आहे. किराणा, औषधे, फळे, भाजी आदी जीवनावश्यक साहित्याची दुकाने सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी आदेशात म्हटले आहे.पोलिसांना कारवाईचे अधिकारजिल्हाधिकाºयांनी २१ ते २५ मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन व्यक्ती, संस्था वा संघटनेने केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनीय कायदेशीर कारवाईचे आदेश पोलिसांना बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने पोलिसांना जिल्हा बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.महापालिकेत व्यापाऱ्यांची बैठकमहापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांचीही बैठक याच विषयात शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी दिली. चर्चेअंती २१ ते २५ मार्च या कालावधीत बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, एम.आय.डी.सी. असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, सातुर्णा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, यश पोपली, पवन हरवाणी, मंगल दारा, मनोज खंडलेवाल, विनाद कलंत्री, बालकिसन पांडे, रवींद्र सलुजा, चंद्रकांत पोपट, आत्माराम पुरशवानी, पप्पू गगलानी, प्रमोद भारतीया, बादल कुलकर्णी, अनिल पमनानी आदी उपस्थित होते.रविवारी जनता कर्फ्यूला सहकार्य कराकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व नागरिकांनी जागरूक व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवाल यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी