शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळीने वेढले अमरावती

By admin | Updated: October 29, 2016 03:12 IST

धुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जबाबदारी कुणाची ? : नागरिकांचे आरोग्य धोक्यातवैभव बाबरेकर अमरावतीधुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळीच्या प्रकोपाने अमरावतीकरांमध्ये श्वसनाचे आजार जडत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अमरावती शहर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मोठमोठ्या इमारती व उड्डाणपुलांची कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. मात्र, हे होत असताना एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळच खेळत आहे. इमारती किंवा उड्डाणपुलांचे बांधकाम करताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांवलीचे पालन केले जात आहे किंवा नाही, याकडे कोणातीही यंत्रणा लक्ष पुरवीत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुतांश मार्गावर विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच सततची वाहतूक धूळकण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर एसटी किंवा अन्य जड वाहनांची वाहतूक धूळ उडवीत आहेत. वाहनधारक, पादचाऱ्यांना जाताना अक्षरशा धूळ खातच पुढे जावे लागत आहे. या धुळीमुळे जीव गुदरमल्यासारखा होत आहे. तरीसुद्धा अमरावतीकर निमुटपणे हे सर्व सहन करीत आहेत. लहान बाळ व वयोवृद्धांवर या धूळकणांचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. मात्र, ते सांगणार तरी कोणाला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या धुळीचे वाईट परिणाम जाणवत असतानाही त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभाग घेत नाही. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत धूळकणाविषयी सतर्कता बाळगून तत्काळ उपाययोजना केल्या जातात, तर मग अमरावती शहरात धूळकणांबाबत दखल का घेतली जात नाही, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये व दवाखान्यांत रोज अनेक रुग्ण श्वसन आजाराच्या उपचाराकरिता जातात. मात्र, या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. असे किती दिवस चालणार, यावर कधी उपाययोजना अंमलात येईल, असे नाना प्रकारचे प्रश्न अमरावतीकरांना पडले आहेत. धुळीचे कण वाढल्याविषयी काही माहिती नाही. ती जबाबदारी आमची नाही, प्रदूषण हा विषय माझा नाही. धूळकण वाढली हे पहिल्यांदाच कळत आहे. - हेमंत पवार, आयुक्त, महापालिका रस्ते, इमारती बांधकाम, वाहनांच्या प्रदूषणामुळे शहरात धूळकणांचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणासंदर्भात नवीन कायदा अमलात आणला गेला आहे. त्यामध्ये प्रत्येकांची जबाबदारी संबंधित शासकीय विभागांना वाटून देण्यात आली आहे. त्यामधील गाईडलाईनची माहिती होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थासह संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे. त्या नियमावलीनुसार संबंधित विभागाने कार्य केल्यास धूळकणासह प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. - राहुल वानखडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळधूळकणाचा थेट प्रभाव फुफ्फुसावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार जडतात. दमा (अस्थमा), त्वचा रोग, डोळ्यांचे आजार बळावण्याची शक्यता असते. धूळकणांचा आरोग्यावर परिणाम झाल्यास डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्यावा. - स्वप्निल सोनोने,फिजीशियन