शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धुळीने वेढले अमरावती

By admin | Updated: October 29, 2016 03:12 IST

धुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जबाबदारी कुणाची ? : नागरिकांचे आरोग्य धोक्यातवैभव बाबरेकर अमरावतीधुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळीच्या प्रकोपाने अमरावतीकरांमध्ये श्वसनाचे आजार जडत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अमरावती शहर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मोठमोठ्या इमारती व उड्डाणपुलांची कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. मात्र, हे होत असताना एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळच खेळत आहे. इमारती किंवा उड्डाणपुलांचे बांधकाम करताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांवलीचे पालन केले जात आहे किंवा नाही, याकडे कोणातीही यंत्रणा लक्ष पुरवीत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुतांश मार्गावर विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच सततची वाहतूक धूळकण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर एसटी किंवा अन्य जड वाहनांची वाहतूक धूळ उडवीत आहेत. वाहनधारक, पादचाऱ्यांना जाताना अक्षरशा धूळ खातच पुढे जावे लागत आहे. या धुळीमुळे जीव गुदरमल्यासारखा होत आहे. तरीसुद्धा अमरावतीकर निमुटपणे हे सर्व सहन करीत आहेत. लहान बाळ व वयोवृद्धांवर या धूळकणांचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. मात्र, ते सांगणार तरी कोणाला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या धुळीचे वाईट परिणाम जाणवत असतानाही त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभाग घेत नाही. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत धूळकणाविषयी सतर्कता बाळगून तत्काळ उपाययोजना केल्या जातात, तर मग अमरावती शहरात धूळकणांबाबत दखल का घेतली जात नाही, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये व दवाखान्यांत रोज अनेक रुग्ण श्वसन आजाराच्या उपचाराकरिता जातात. मात्र, या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. असे किती दिवस चालणार, यावर कधी उपाययोजना अंमलात येईल, असे नाना प्रकारचे प्रश्न अमरावतीकरांना पडले आहेत. धुळीचे कण वाढल्याविषयी काही माहिती नाही. ती जबाबदारी आमची नाही, प्रदूषण हा विषय माझा नाही. धूळकण वाढली हे पहिल्यांदाच कळत आहे. - हेमंत पवार, आयुक्त, महापालिका रस्ते, इमारती बांधकाम, वाहनांच्या प्रदूषणामुळे शहरात धूळकणांचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणासंदर्भात नवीन कायदा अमलात आणला गेला आहे. त्यामध्ये प्रत्येकांची जबाबदारी संबंधित शासकीय विभागांना वाटून देण्यात आली आहे. त्यामधील गाईडलाईनची माहिती होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थासह संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे. त्या नियमावलीनुसार संबंधित विभागाने कार्य केल्यास धूळकणासह प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. - राहुल वानखडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळधूळकणाचा थेट प्रभाव फुफ्फुसावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार जडतात. दमा (अस्थमा), त्वचा रोग, डोळ्यांचे आजार बळावण्याची शक्यता असते. धूळकणांचा आरोग्यावर परिणाम झाल्यास डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्यावा. - स्वप्निल सोनोने,फिजीशियन