शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

अमरावती काँग्रेसचाच गड; वानखडेंना ४१,६४८ मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:38 IST

Amravati Lok Sabha Results 2024 : दलित, मुस्लीम समाजाचे जंबो मतदान; 'डीएमके 'चीही साथ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तब्बल २८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघात 'पंजा' खेचून आणला. बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून ४१ हजार ६४८ मतांची आघाडी मिळाली आहे. २६ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी मुस्लीमबहुल भागातील केंद्रावर मतदारांच्या लांबलचक रांगा था काँग्रेस उमेदवाराच्या विजयात 'चौकार' लावणार असा अंदाज बांधला गेला. अखेर मंगळवारी निकालाअंती ते स्पष्ट झाले आहे.

बळवंत वानखडे यांना अमरावतींचा नवा खासदार बनविण्यात माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर या 'किंगमेकर' ठरल्या आहेत, तर अमरावती विधानसभा मतदारसंघाची धुरा माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहराच्यक्ष बबलू शेखावत या त्रिमूलीकडे सोपविली होती. विशेषतः दलित, मुस्लीम समाजाच्या मतदारांवर विशेष फोकस करताना लहान-सहान घटकांना लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसने लक्ष केले. त्याबरोबर कुणबी, पाटील, देशमुख मतदारांची समर्थ साथ मिळाल्याने बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून ४१ हजार ६४८ मतांचा लीड घेता आला. वानखडे यांना बडनेरा, मेळघाट वगळता अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, हे विशेष. 

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकसंध असल्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभेतून मताधिक्य मिळविता आले.

आतापर्यंत केवळ दोनच उमेद्वार मतदारांनी रिपीट• आतापर्यंत अमरावतीकर मतदारांनी डॉ. पंजाबराव देशमुख, कृष्णराव देशमुख, उषा चौधरी, अनंत गुहे व आनंदराव अडसूळ यांना सलग दोनदा खासदार म्हणून निवडून दिले.•  डॉ. पंजाबराव देशमुख व कृष्णराव देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या अनंत गुडे यांना तीनदा अमरावतीचा खासदार होण्याची संधी मिळाली. गुढे यांचा १९९८ मध्ये पराभव झाला. मात्र १९९९ व २००४ मध्ये ते सलग दोनदा खासदार झाले.• उषा चौधरी या २९८० व १९८४ साली व 3 आनंद अडसूळ हे सन २००९ व २०१४ सलग दुसन्यांदा अमरावती लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीत गेले होते, मात्र नवनीत राणा यांनी पक्ष बदल करुनही त्यांना पुन्हा दूसऱ्यांदा खासदारकी मिळविता आली नाही.

काँग्रेसचे विधानसभा, महापालिका निवडणूक टार्गेट अमरावती लोकसभा निवडणुकीत बळवंत वानहाडे वांच्या प्रचारादरम्यान शहर काँग्रेसने विधानसभा, महापालिका निवडणूक लक्ष ठेवले होते. त्या दिशेने बांधणीदेखील चालविली आहे. मुस्लीमबहुल भागावर फोकस करताना स्थानिक नेते, कार्यकत्यांची चाचपणीदेखील करण्यात आली आहे. सध्या काँग्रेसच्या सुलभा खोडके या अमरावतीच्या आमदार आहेत.

३० उमेदवारांवर भारी ठरला 'नोटा'लोकसभा मतदारसंघात यावेळी 'नोटा ला २५४४ मते पडली आहेत. ती सर्व वैध मते आहेत. यावेळी तब्बल ३० उमेदवारांपेक्षा नोटा (नन ऑफ अवाँह) भारी पडला आहे. यावेळी कॉग्रेसचे बळवंत वानखडे, भाजपच्या नवनीत राणा, प्रहारचे दिनेश खूब, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, संजयकुमार गाडगे, किशोर लबडे व सुमित्रा गायकवाड यांना नोटापेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. याची सर्वत्र चर्चा आहे.

परकोटाच्या आतील भागात काँग्रेसची बल्ले बल्लेलोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कधी नव्हे पहिल्यांदाच परकोटाच्या आत चळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसला मते मिळाली आहेत. एरव्ही बुधवारा, जवाहर गेट, अंबागेट यासह परकोटाच्या आतील भाग हा भाजप-सेनेचा गणला जातो. मात्र, यंदा काँग्रेससोबत ठाकरे सेना सोबत असल्यामुळे माजी खासदार अनंत मुठे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे. प्रवीण हरमकर यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याचे दिसून आले.

अमरावतीतून १ लाख १४ हजार ७०२ मतेबळवंत वानखाडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून १ लाख १४ हजार ७०२ मते मिळाली आहे. अमरावती हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपचे जगटीश गुप्ता है अपवाद वगळता अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उषाताई चौधरी, अनंत गुढे, आनंदराव अडसूळ यांनीदेखील अमरावतीचे लोकसभेत नेतृत्व केले आहे.

सट्टाबाजाराचे आकलन खरे ठरलेएक्झिट पोलनंतरही बुकीनी दिलेल्या लाईननुसार अमरावतीची जागा भाजपाच्या हातून जाणार आणि तेथे काँग्रेसच येणार असे सांगितल्याने सटोड्यांनी भरभरून सट्टा लावला होता. राणांवर अनेकांनी कोट्यवधीचे डाव खेळले, त्यामुळे त्या ठिकाणी बुळी जिंकले. शेवटच्या दिवसापर्यंत बळवंत वानखडे यांच्या बाजुने सट्टाबाजार होता.

डॉ. अनिल बोंडे समोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाअमरावती लोकसभा मतदार संघात मतमोजणी आटोपल्यानंतर मतमोजणीतील आकडेवारी जुळत नसल्याचा आक्षेप भाजपच्या वतीने घेण्यात आला. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यानी आक्षेची तक्रार देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याना देण्यासाठी आले होते. त्यानंतर ते परत जात असतांना उपस्थित काँग्रेस कार्यकत्यांनी डॉ. बोंडे यांच्यासमोर जोरदार घोषणा दिल्या. अबकी बार तडीपार, व जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा