शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:31 IST

Amravati : पिकांची वाढ खुंटली, अर्ध्यापेक्षा जास्त पावसाचा संपला, ३१ टक्के तूट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी ५६ टक्के नांदगाव खंडेश्वर, ५६.६ टक्के भातकुली व ५७.५ टक्के पाऊस धारणी तालुक्यात झालेला आहे. याशिवाय १९ मंडळात सरासरीच्या ५० ते ६० टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात ३१ टक्के पावसाची तूट आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने पिकांची वाढ खुंटली. अर्धापेक्षा जास्त पावसाळा संपल्याने या तालुक्यांसह १९ महसूल मंडळात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.

जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत ४७८.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२९.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी ६९ आहे. यामध्ये फक्त तिवसा तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सर्वात कमी नांदगाव खंडेश्वर ५६.३ टक्के, धारणी ५७.५ टक्के, अचलपूर ६०.७टक्के व भातकुली तालुक्यात ५६.७टक्केच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याची हवामान स्थितीयु.पी., पंजाब आणि बिहारवर हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे आहेत. मान्सूनची ट्रफरेषा सध्या फिरोजपूर, चंडीगड, पाटणावरून बंगालच्या उपसागरात गेलेली आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस कमी झालेला आहे आणि पावसाची उसंत आहे. ७ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 

चुर्णीत सर्वात कमी ३९ टक्केच पाऊसचुरनी महसूल मंडळात सर्वात कमी ३९.५ टक्के तर वरखेड मंडळात सर्वाधिक १४९ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सरासरीच्या तुलनेत फक्त ५० ते ६० टक्के पाऊस धारणी, सावलीखेडा, साद्राबाडी, गौलखेडा बाजार, अमरावती, बडनेरा, वलगाव, भातकुली, आष्टी, आसरा, खोलापूर, नांदगाव, मंगरूळ, लोणी, धानोरा, माहुली, दारापूर, अचलपूर, परसापूर व परतवाडा मंडळात झाला. पावसाअभावी जमिनीत पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. शिवाय भूजलस्तरदेखील वाढलेला नाही. नदी-नाल्यांनादेखील फारसे पाणी नाही.

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊसअमरावती तालुक्यात ६४ टक्के, चांदूरबाजार ७९.६ टक्के, मोर्शी ८९.९ टक्के, वरुड ८८.४ टक्के, दर्यापूर ८१ टक्के, अंजनगाव ८६.५, चांदूरबाजार ७९.६ टक्के व धामणगाव तालुक्यात ७८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवस रिमझिम पावसाने पिकांना उभारी मिळाली असली, तरी पावसाची तूट कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती