शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:31 IST

Amravati : पिकांची वाढ खुंटली, अर्ध्यापेक्षा जास्त पावसाचा संपला, ३१ टक्के तूट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी ५६ टक्के नांदगाव खंडेश्वर, ५६.६ टक्के भातकुली व ५७.५ टक्के पाऊस धारणी तालुक्यात झालेला आहे. याशिवाय १९ मंडळात सरासरीच्या ५० ते ६० टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात ३१ टक्के पावसाची तूट आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने पिकांची वाढ खुंटली. अर्धापेक्षा जास्त पावसाळा संपल्याने या तालुक्यांसह १९ महसूल मंडळात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.

जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत ४७८.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२९.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी ६९ आहे. यामध्ये फक्त तिवसा तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सर्वात कमी नांदगाव खंडेश्वर ५६.३ टक्के, धारणी ५७.५ टक्के, अचलपूर ६०.७टक्के व भातकुली तालुक्यात ५६.७टक्केच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याची हवामान स्थितीयु.पी., पंजाब आणि बिहारवर हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे आहेत. मान्सूनची ट्रफरेषा सध्या फिरोजपूर, चंडीगड, पाटणावरून बंगालच्या उपसागरात गेलेली आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस कमी झालेला आहे आणि पावसाची उसंत आहे. ७ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 

चुर्णीत सर्वात कमी ३९ टक्केच पाऊसचुरनी महसूल मंडळात सर्वात कमी ३९.५ टक्के तर वरखेड मंडळात सर्वाधिक १४९ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सरासरीच्या तुलनेत फक्त ५० ते ६० टक्के पाऊस धारणी, सावलीखेडा, साद्राबाडी, गौलखेडा बाजार, अमरावती, बडनेरा, वलगाव, भातकुली, आष्टी, आसरा, खोलापूर, नांदगाव, मंगरूळ, लोणी, धानोरा, माहुली, दारापूर, अचलपूर, परसापूर व परतवाडा मंडळात झाला. पावसाअभावी जमिनीत पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. शिवाय भूजलस्तरदेखील वाढलेला नाही. नदी-नाल्यांनादेखील फारसे पाणी नाही.

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊसअमरावती तालुक्यात ६४ टक्के, चांदूरबाजार ७९.६ टक्के, मोर्शी ८९.९ टक्के, वरुड ८८.४ टक्के, दर्यापूर ८१ टक्के, अंजनगाव ८६.५, चांदूरबाजार ७९.६ टक्के व धामणगाव तालुक्यात ७८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवस रिमझिम पावसाने पिकांना उभारी मिळाली असली, तरी पावसाची तूट कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती