शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:31 IST

Amravati : पिकांची वाढ खुंटली, अर्ध्यापेक्षा जास्त पावसाचा संपला, ३१ टक्के तूट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी ५६ टक्के नांदगाव खंडेश्वर, ५६.६ टक्के भातकुली व ५७.५ टक्के पाऊस धारणी तालुक्यात झालेला आहे. याशिवाय १९ मंडळात सरासरीच्या ५० ते ६० टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात ३१ टक्के पावसाची तूट आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने पिकांची वाढ खुंटली. अर्धापेक्षा जास्त पावसाळा संपल्याने या तालुक्यांसह १९ महसूल मंडळात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.

जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत ४७८.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२९.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी ६९ आहे. यामध्ये फक्त तिवसा तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सर्वात कमी नांदगाव खंडेश्वर ५६.३ टक्के, धारणी ५७.५ टक्के, अचलपूर ६०.७टक्के व भातकुली तालुक्यात ५६.७टक्केच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याची हवामान स्थितीयु.पी., पंजाब आणि बिहारवर हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे आहेत. मान्सूनची ट्रफरेषा सध्या फिरोजपूर, चंडीगड, पाटणावरून बंगालच्या उपसागरात गेलेली आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस कमी झालेला आहे आणि पावसाची उसंत आहे. ७ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 

चुर्णीत सर्वात कमी ३९ टक्केच पाऊसचुरनी महसूल मंडळात सर्वात कमी ३९.५ टक्के तर वरखेड मंडळात सर्वाधिक १४९ टक्के पावसाची नोंद झाली. याशिवाय सरासरीच्या तुलनेत फक्त ५० ते ६० टक्के पाऊस धारणी, सावलीखेडा, साद्राबाडी, गौलखेडा बाजार, अमरावती, बडनेरा, वलगाव, भातकुली, आष्टी, आसरा, खोलापूर, नांदगाव, मंगरूळ, लोणी, धानोरा, माहुली, दारापूर, अचलपूर, परसापूर व परतवाडा मंडळात झाला. पावसाअभावी जमिनीत पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. शिवाय भूजलस्तरदेखील वाढलेला नाही. नदी-नाल्यांनादेखील फारसे पाणी नाही.

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊसअमरावती तालुक्यात ६४ टक्के, चांदूरबाजार ७९.६ टक्के, मोर्शी ८९.९ टक्के, वरुड ८८.४ टक्के, दर्यापूर ८१ टक्के, अंजनगाव ८६.५, चांदूरबाजार ७९.६ टक्के व धामणगाव तालुक्यात ७८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवस रिमझिम पावसाने पिकांना उभारी मिळाली असली, तरी पावसाची तूट कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती