शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 20:03 IST

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 

वीरेंद्रकुमार जोगी/ अमरावती, दि. 19  : यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अंदाजित आहे. ऑगस्ट महिन्यात २० तारखेपर्यंत ५५७ मिमी पाऊस व्हावा, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १९ आॅगस्टपर्यंत ३२४.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३९.८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ७३८ मिमी पाऊस झाला होता. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचलपूर उपविभागातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्यात यंदा पावसाने ४० टक्के देखील पाऊस झाला नाही. अचलपूर तालुक्यात ३१.२, दर्यापूर ३५.६, अंजनगाव २७.१, चिखलदरा ३७.५ व धारणी तालुक्यात केवळ ४०.१ टक्के पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात झाला असून येथील सरासरी ५१.३ एवढी आहे. जिल्ह्याच्या पेरणीचा अंदाज घेतला तर अंजनगाव तालुक्यात अंदाजित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ६७०० हेक्टर, अचलपूर ५४३१, चांदूर बाजार १२८४७, चांदूररेल्वे १६२२, तिवसा २८१८, मोर्शी ९३६२, वरुड २७७८, दर्यापूर १९८५, धारणी ४१५, चिखलदरा १९९४, भातकुली १३४२, नांदगाव खंडेश्वर, २१२० व अमरावती तालुक्यात १३४२ हेक्टर क्षेत्रात कमी पेरणी झाली आहे. धामणगाव तालुक्यात अंदाजित क्षेत्राच्या तुलनेत ४११ हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. दर्यापूर, अंजनगाव, भातकुली तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. धामणगाव, तिवसा, चांदूररेल्वे, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यातील पिके वाढली. मात्र पाऊस झाला नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन निम्मे होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.  शेतकरी पिकविम्यापासून वंचित पंतप्रधान पीकविमा योजनचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, यासाठी वाढ देण्यात आली होती. मात्र जाचक अटीमुळे अनेकांना पीकविमा काढता आला नाही. यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यतादेखील कमी आहे.  जिल्ह्यातील पिकांची अवस्था पाहून जिल्हापरिषदेने दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव घेतला असून तो शासनाकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेची कृषी समिती जिल्ह्यातील पिकांची माहिती घेत आहेत. राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. - नितीन गोंडाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद  १० एकर जमिनीवर सोयाबीन पेरले; पण उगवण झाली नसल्याने त्यावर रोटावेटर फिरविले. तूर उगवली पण वाढ झाली नाही, मूग, उडीद व हायब्रिड ज्वारीलादेखील मोड आली आहे. खरीप झाला नाही. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. - दिलीप शेळके, शेतकरी, रासेगाव, अचलपूर  यंदा आस्मानी व सुल्तानी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. कमी पावसाचा फटका यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने शेतकºयांना मदत करावी. - धीरज दवे, शेतकरी, चांदूर बाजार

टॅग्स :Farmerशेतकरी