शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 20:03 IST

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 

वीरेंद्रकुमार जोगी/ अमरावती, दि. 19  : यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अंदाजित आहे. ऑगस्ट महिन्यात २० तारखेपर्यंत ५५७ मिमी पाऊस व्हावा, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १९ आॅगस्टपर्यंत ३२४.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३९.८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ७३८ मिमी पाऊस झाला होता. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचलपूर उपविभागातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्यात यंदा पावसाने ४० टक्के देखील पाऊस झाला नाही. अचलपूर तालुक्यात ३१.२, दर्यापूर ३५.६, अंजनगाव २७.१, चिखलदरा ३७.५ व धारणी तालुक्यात केवळ ४०.१ टक्के पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात झाला असून येथील सरासरी ५१.३ एवढी आहे. जिल्ह्याच्या पेरणीचा अंदाज घेतला तर अंजनगाव तालुक्यात अंदाजित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ६७०० हेक्टर, अचलपूर ५४३१, चांदूर बाजार १२८४७, चांदूररेल्वे १६२२, तिवसा २८१८, मोर्शी ९३६२, वरुड २७७८, दर्यापूर १९८५, धारणी ४१५, चिखलदरा १९९४, भातकुली १३४२, नांदगाव खंडेश्वर, २१२० व अमरावती तालुक्यात १३४२ हेक्टर क्षेत्रात कमी पेरणी झाली आहे. धामणगाव तालुक्यात अंदाजित क्षेत्राच्या तुलनेत ४११ हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. दर्यापूर, अंजनगाव, भातकुली तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. धामणगाव, तिवसा, चांदूररेल्वे, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यातील पिके वाढली. मात्र पाऊस झाला नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन निम्मे होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.  शेतकरी पिकविम्यापासून वंचित पंतप्रधान पीकविमा योजनचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, यासाठी वाढ देण्यात आली होती. मात्र जाचक अटीमुळे अनेकांना पीकविमा काढता आला नाही. यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यतादेखील कमी आहे.  जिल्ह्यातील पिकांची अवस्था पाहून जिल्हापरिषदेने दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव घेतला असून तो शासनाकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेची कृषी समिती जिल्ह्यातील पिकांची माहिती घेत आहेत. राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. - नितीन गोंडाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद  १० एकर जमिनीवर सोयाबीन पेरले; पण उगवण झाली नसल्याने त्यावर रोटावेटर फिरविले. तूर उगवली पण वाढ झाली नाही, मूग, उडीद व हायब्रिड ज्वारीलादेखील मोड आली आहे. खरीप झाला नाही. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. - दिलीप शेळके, शेतकरी, रासेगाव, अचलपूर  यंदा आस्मानी व सुल्तानी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. कमी पावसाचा फटका यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने शेतकºयांना मदत करावी. - धीरज दवे, शेतकरी, चांदूर बाजार

टॅग्स :Farmerशेतकरी