शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्रात अमरावती, अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:36 IST

मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली.अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

अमरावती - मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे. अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, पश्चिम विदर्भ ते मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या स्थितीमुळे पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पावसाची शक्यता आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहे. उष्ण वाऱ्यामुळे अमरावतीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही तीच नोंद कायम राहिली. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, कमाल तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी राज्याच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमान होते. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार आहे. 

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ असे आहे गुरुवारचे तापमान

अकोला ४४.०अमरावती ४३.८बुलडाणा ४१.२ब्रम्हपुरी ४१.७गडचिरोली ४०.२गोंदीया ४०.०नागपूर ४१.२वर्धा ४३.०यवतमाळ ४२.०

विदर्भात पाऊस

शुक्रवार, शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अधिक शक्यता आहे. कमाल तापमानात घट होईल. पुढील पाच सहा दिवस कमाल तापमान ४२ ते ४३.५ अंशाच्या आसपास राहील. १० एप्रिलपर्यंत पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता आहे.

यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तरपश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असल्याची शक्यता आहे़. तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामानविभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची ४४ टक्के शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.

 

टॅग्स :TemperatureतापमानAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोला