शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्रात अमरावती, अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:36 IST

मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली.अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

अमरावती - मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे. अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, पश्चिम विदर्भ ते मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या स्थितीमुळे पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पावसाची शक्यता आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहे. उष्ण वाऱ्यामुळे अमरावतीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही तीच नोंद कायम राहिली. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, कमाल तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी राज्याच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमान होते. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार आहे. 

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ असे आहे गुरुवारचे तापमान

अकोला ४४.०अमरावती ४३.८बुलडाणा ४१.२ब्रम्हपुरी ४१.७गडचिरोली ४०.२गोंदीया ४०.०नागपूर ४१.२वर्धा ४३.०यवतमाळ ४२.०

विदर्भात पाऊस

शुक्रवार, शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अधिक शक्यता आहे. कमाल तापमानात घट होईल. पुढील पाच सहा दिवस कमाल तापमान ४२ ते ४३.५ अंशाच्या आसपास राहील. १० एप्रिलपर्यंत पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता आहे.

यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तरपश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असल्याची शक्यता आहे़. तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामानविभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची ४४ टक्के शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.

 

टॅग्स :TemperatureतापमानAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोला